Tuesday, November 28, 2023

BHATKULI | भाजपा भातकुली तालुक्याच्या वतीने भातकुली येथील ठाणेदार यांना निवेदन


भाजपा भातकुली तालुक्याच्या वतीने भाजप नेते खासदार  डॉ अनिल बोंडे साहेब यांच्यावर दिनांक 25 ला तिवसा येथे शंकरपाटामध्ये अज्ञात व्यक्तींकडून 
जी दगडफेक करण्यात आली त्याच्या निषेधार्थ 
आज भातकुली येथील ठाणेदार यांना निवेदन 
देण्यात आले .
दोशींवर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी भातकुली भाजपा नगरसेवक सतीश आठवले,तालुकाध्यक्ष सोपान गुडधे,तालुका सरचिटणीस योगेश उघडे, उमेश भुसारी ओबीसी मोर्चा अध्यक्ष ,बाळा भजभुजे उपाध्यक्ष तालुका ,रीतेश माकोडे अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा, यश शिरोळे युवा मोर्चा , दिनेश खेडकर, वैभव गुडधे,सादिक भाई यावेळी उपस्थित होते..

Monday, November 27, 2023

27 NOVEMBER 2023 आज का राशिफल

मेष राशि
आज का दिन आपके लिए उत्तम रूप से फलदायक रहने वाला है। आपके घर किसी मांगलिक कार्यक्रम का आयोजन हो सकता है। प्रेम जीवन जी रहे लोग साथी के लिए कुछ नए कपड़े, गहने आदि लेकर आ सकते हैं। आप किसी काम के पूरा न होने से थोड़ा परेशान रहेंगे और धन-धान्य में वृद्धि होगी, इसलिए आपको लेनदेन से संबंधित यदि कोई समस्या थी, तो वह सुलझ सकती है। किसी परिवार के सदस्य से आप बेवजह के लड़ाई झगड़े में ना पड़े, नहीं तो वह बढ़ सकता है। प्रॉपर्टी डीलिंग का काम कर रहे लोगों को कोई अच्छा मौका मिल सकता है।

वृष राशि
आज का दिन आपके लिए सामान्य रहने वाला है। वाणिज्यिक मामलो में आपकी खूब चर्चा रहेगी। आपके चारों ओर का वातावरण खुशनुमा रहेगा। रचनात्मक कार्य में आपकी पूरी रुचि रहेगी और आप अपनी सोच से कुछ ऐसे काम करेंगे, जिससे परिवार के सदस्यों को भी खुशी होगी, लेकिन किसी अजनबी पर भरोसा करना आपको नुकसान दे सकता है। माताजी से आप अपने मन की किसी इच्छा को लेकर बातचीत कर सकते हैं। प्रेम जीवन जी रहे लोग साथी के साथ किसी लॉन्ग ड्राइव पर जाने की योजना बना सकते हैं।

मिथुन राशि 
आज का दिन लेनदेन के मामले में सावधानी बरतने के लिए रहेगा। आपको उधार लेने से बचना होगा। कार्यक्षेत्र में आप कुछ ठगी और सफेदपोश लोगों से सावधान रहे, नहीं तो वह आपको परेशान कर सकते हैं। पारिवारिक रिश्तों में चल रही समस्याओं को आपको धैर्य रखकर सुलझाना होगा। आप अपने धन का कुछ हिस्सा दान पुण्य के कार्य में भी लगा सकते हैं। आपको कुछ ठगी और सफेदपोश लोगों से सावधान रहने की आवश्यकता है। यदि आपको कोई बड़ा लाभ का सौदा हाथ लगे, तो आप उस पर बहुत ही सोच विचारकर अमल करें।

कर्क राशि
आज का दिन आपके लिए व्यस्तता भरा रहने वाला है। वाणिज्यिक मामलों में आपके संपर्क बेहतर रहेंगे। वरिष्ठजनों से आपकी खूब पटेगी क्योंकि आप कुछ उनके साथ बैठकर कुछ पुरानी यादों को ताजा करेंगे। आप कार्यक्षेत्र में अपनी जिम्मेदारियों में बिल्कुल ढील ना दें, नहीं तो इससे आपको कोई नुकसान हो सकता है। प्रशासन के कार्यों में तेजी आएगी। कारोबार कर रहे लोगों ने यदि किसी को साझेदार बनाया, तो वह उनका कोई नुकसान करवा सकते हैं, इसलिए आपको अपनी आंख और कान खुली रखनी होगी। विद्यार्थी किसी नए रिसर्च की ओर आगे बढ़ेंगे।

सिंह राशि
आज का दिन आपके लिए महत्वपूर्ण रहने वाला है। धार्मिक कार्यों के प्रति आपकी आस्था बढ़ेगी और पैतृक मामलों में आपको सावधान रहना होगा। यदि आपका कोई प्रॉपर्टी संबंधित मामला कानून में चल रहा है, तो उसमें भी आपको जीत मिलेगी। अधिकारियों के साथ आपका समर्थन बढ़ेगा। आपको अपने लाभ के अवसरों पर पूरा ध्यान देना होगा। किसी को आप यदि कोई सलाह देंगे, तो वह उसका गलत मतलब निकाल सकते हैं। आपको अपने माता-पिता की सेवा के लिए भी  कुछ समय निकालना होगा।

कन्या राशि
आज का दिन आपके लिए भाग्य के दृष्टिकोण से अच्छा रहने वाला है। आध्यात्मिक कार्यो में आपकी पूरी रुचि रहेगी और धार्मिक गतिविधियों में आप आगे बढ़ेंगे। व्यापार कर रहे लोगों के लिए दिन अच्छा रहेगा। विद्यार्थियों के उच्च शिक्षा के मार्ग प्रशस्त होंगे और आप कोई ऐसा काम ना करें, जिससे कि आपको किसी बात के लिए शर्मिंदगी महसूस हो। विविध विषयों में आपकी पूरी रुचि रहेगी और आपकी योजनाएं यदि लंबे समय से लटक रही थी, तो वह पूरी हो सकती हैं। आपको किसी विरोधी की बातों में नहीं आना है।

तुला राशि
आज का दिन आपके लिए अकस्मात लाभ दिलाने वाला रहेगा। आप अपने खान-पान में सात्विकता बनाए रखें, नहीं तो समस्या हो सकती है। स्वास्थ्य में यदि कुछ समस्याएं आपको लंबे समय से घेरे हुई थी, तो उनसे आपको छुटकारा मिलेगा। आपको व्यवसाय पर पूरा जोर बनाए रखना होगा। आप अपने जोखिम भरे कामों में बिल्कुल हाथ ना डालें और जो लोग सट्टेबाजी में धन का निवेश करते हैं, उन्हें सावधान रहने की आवश्यकता है, नहीं तो आपका धन बढ़ सकता है। आपके कुछ नए काम को करने के प्रयास आज रंग लाएंगे।

वृश्चिक राशि
आज दांपत्य जीवन खुशनुमा रहेगा और मित्रों के साथ संबंधों में यदि किसी बात को लेकर अनबन चल रही थी, तो वह भी दूर होगी। नेतृत्व क्षमता बढ़ेगी। आप अपने व्यवसाय में छुटपुट लाभ के अवसरों को लपककर आगे बढ़े, तभी आप बिजनेस में लाभ उठा पाएंगे। आपको करियर को लेकर आज कोई बड़ा निर्णय लेना पड़ सकता है। परिवार में किसी सदस्य को घर से दूर नौकरी मिलने के कारण जाना पड़ सकता है, लेकिन विद्यार्थी पढ़ाई लिखाई में अच्छा प्रदर्शन करेंगे और चली आ रही समस्याओं को लेकर अपने गुरु चरणों से बातचीत कर सकते हैं।

धनु राशि
आज का दिन नौकरी में कार्यरत लोगों के लिए अच्छा रहने वाला है। आप अपनी मेहनत में कोई कसर ना छोड़ें, उसी से आप कार्यक्षेत्र में एक अलग जगह बनाने में कामयाब रहेंगे। आपको कारोबार में अपने निरंतर प्रयासों से आगे बढ़ना होगा। आप अपने बढ़ते खर्चों पर नियंत्रण बनाएं, नहीं तो समस्या हो सकती है। यदि आपने किसी से धन उधार लिया था, तो वह आपको वापस मिल सकता है। माता-पिता के आशीर्वाद से आपका कोई रुका हुआ काम पूरा होगा। वाहन की अकस्मात खराबी के कारण आपका धन खर्च बढ़ सकता है, इसलिए आप किसी यात्रा पर ना जाएं।

मकर राशि
आज का दिन आपके लिए बहुत ही सूझबूझ दिखाकर आगे बढ़ाने के लिए रहेगा। आर्थिक मामलों में आप पर पूरा विश्वास बना रहेगा और संस्कारों व परंपराओं की सीख पर आप आगे बढ़ेंगे। कार्यक्षेत्र में आप अच्छा प्रदर्शन करेंगे और अधिकारियों से आपको शाबाशी भी मिल सकती है। रोजगार की तलाश में इधर-उधर भटक रहे लोगों को कोई शुभ सूचना सुनने को मिल सकती है। विद्यार्थी अपने मित्रों के साथ किसी पिकनिक आदि पर जाने की योजना बना सकते हैं, लेकिन उन्हें इसके साथ-साथ अपनी परीक्षाओं पर भी पूरा ध्यान देना होगा।

कुंभ राशि
आज का दिन आपके लिए सुख-समृद्धि बढ़ाने वाला है। व्यक्तिगत मामले आपके पक्ष में रहेंगे और व्यक्तिगत विषयों पर आपका पूरा फोकस रहेगा। आप अपने घर के कामों को लेकर थोड़ा परेशान रहेंगे, जिसके कारण परिवार के सदस्यों से भी आपसी कलह पनप सकती है। आपको अपनी सुख सुविधाओं की वस्तुओं की खरीदारी की वस्तुओं पर आप अच्छा खासा धन व्यय करेंगे, लेकिन उसमें अपनी आय को ध्यान में रखकर ही व्यय करें, तो आपके लिए बेहतर रहेगा। ससुराल पक्ष का कोई व्यक्ति आपसे धन-उधार मांगने आ सकता है।

मीन राशि
आज का दिन व्यवसाय कर रहे लोगों के लिए थोड़ा कमजोर रहने वाला है। आप अपनी योजनाओं को लेकर परेशान चल रहे थे, तभी वह पूरी हो सकती हैं। धार्मिक कार्यों में आपकी पूरी रुचि रहेगी और सामाजिक कार्यक्रमों में यदि आप सम्मिलित हो, तो उसमें अपने कामों पर पूरा ध्यान दें, नहीं तो समस्या हो सकती है। कार्यक्षेत्र में आपके किए गए निरंतर प्रयास रंग लाएंगे, जिसके कारण आपको किसी बड़े पद की प्राप्ति हो सकती है, लेकिन आप जिम्मेदारियां बढ़ने से थोड़ा परेशान तो रहेंगे। संतान आपकी उम्मीदों पर खरी उतरेगी।

MAHARASHTRA | दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय…

शासकीय नोकऱ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली
स्वाधारच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करणार
दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची प्रणाली सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्वच शासकीय विभागांनी दिव्यांगांचे विषय गांभीर्याने घेऊन त्यांच्यासाठी असलेल्या योजना, कार्यक्रम गरजूंपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा, यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत राज्यातील दिव्यांगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांच्या दारी अभियान राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचेसह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासकीय नोकऱ्यांमधील दिव्यांगांच्या आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देतानाच विभागनिहाय अनुशेषाची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मूकबधीर दिव्यांग व्यक्तींना वाहन परवाने देण्यासाठी नियमात दुरुस्ती आवश्यक असून त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची कार्यवाही करावी. दिव्यांगांच्या विविध प्रकारातील पदवीधरांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

कंत्राटी पदभरतीत दिव्यांगांना आरक्षण :- शासकीय विभागांमध्ये मानधनावरील कंत्राटी पदे भरताना दिव्यांगांना त्यात आरक्षण देण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. दहावी-बारावीमधील दिव्यांग विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये प्रवेश आहे त्याच ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याच्या नियमाची अंमलबजावणी करावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्हा, तालुका, मोठ्या शहरांमध्ये रहदारीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी गटई कामगारांप्रमाणे दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल्स देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.




AMRAVATI | मनपात महर्षि सुदर्शन जयंती साजरी

  ,
अमरावती प्रतिनिधी, 
सोमवार दिनांक २७ नोव्‍हेंबर,२०२३ रोजी महर्षि सुदर्शन यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. महर्षि सुदर्शन यांची जयंती निमित्‍य सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव यांचे हस्‍ते म‍हर्षि सुदर्शन यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका‍ कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले. 
यावेळी जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक राजेश राठोड, प्रमोद मोहोड, अशोक पासरे, अजय कनोजे, नंदु धवसेल, शिवाजी मार्वे, सुधीर पासरे, रवि पछेल, शंकर धवसेल, किशोर पासरे, नरेश धवसेल, केतन कनोजे, राकेश पछेल, निलेश कनोजे, संजय पासरे, जगदीश पछेल, कुणाल पासरे, कुणाल ईमले, हर्ष पछेल, हर्षित धवसेल, लकी कनोजे, राम उसरे, वीर कनोजे, रौनक पछेल, अंगद पछेल, मंथन कनोजे, तुषार पासरे, भुषण खडेकार, निरज तिवारी, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, November 26, 2023

कुन्हा येथील 'त्या' बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस सुरूच आरोग्य विभाग पुन्हा पाठविणार चमू




करजगाव : तालुक्यातील कुन्हा देशमुख येथील बोगस डॉक्टरच्या तक्रारीपश्चातही त्याची प्रॅक्टिस सुरूच असल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. चांदूर बाजार तालुक्यात कुन्हा देशमुख येथे देबाशिष सिकंदर हा स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत गेल्या २० वर्षांपासून मूळव्याधसह इतर आजारांवर उपचाराचा बनाव करीत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत कुठली जीवितहानी झाली नसली तरी या अज्ञानी व्यक्तीमुळे शक्यता केव्हाही खरी होऊ शकते. संबंधित व्यक्तीबाबत तक्रार केली असता, आरोग्य विभागाने कुन्हा देशमुख गाठले होते. त्यावेळी देबाशिषने पलायन केले होते. मात्र, तेव्हापासून आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे वळून पाहिले नाही. परिणामी बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस जोरात आहे. तालुका आरोग्य प्रशासन कारवाईबाबत उदासीन असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली आहे.


आरोग्य विभागाची चमू गेली असता, तो बोगस डॉक्टर मिळाला नाही तसेच दवाखाना असल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चमू पाठवून पाहणी करणार आहे. बोगस डॉक्टर मिळाल्यास नक्की कारवाई केली जाईल.

डॉ. ज्योस्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार

Labels: , ,

ग्रामसभेद्वारे होणार मतदार यादीची दुरुस्ती



अमरावती : जिल्हा प्रशासनाद्वारा ९ डिसेंबरपर्यंत दर शनिवारी व रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. याचदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन मतदार यादीचे वाचन होईल व याद्वारे आवश्यक दुरुस्ती करून अचूक मतदार यादी करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी सांगितले. यावेळी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय उपस्थित होत्या. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादीत १८ वर्षांवरील नागरिकांचा समावेश असला पाहिजे. यामध्ये कुणीही वंचित राहायला नको. याशिवाय स्थलांतरित व अन्यत्र रहिवासी नागरिकांची नावे वगळणे महत्त्वाचे आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटीदरम्यान त्यांना मतदार, मृत, स्थलांतरित नागरिकांची माहिती देऊन सहकार्य करावे. एकदा उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदार यादीमध्ये बदल करण्यात येणार नसल्याचे कटियार म्हणाले.शाळा, महाविद्यालयांत कॅम्प सुरू असून, १८ वर्षांचे झालेले व होत असलेल्या मतदारांच्या नावनोंदणीचा व्यापक कार्यक्रम सुरू आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, रणजित भोसले, अनिल भटकर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख उपस्थित होते.


  मतदार यादीचे शुद्धीकरण, आठ हजार मतदार कमी

जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये २५,००,५८० मतदार होते व २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २३,९२,५३५ मतदार संख्या आहे. या १० महिन्यांत तब्बल ८०४५ मतदार कमी झाले. बीएल- ओंद्वारा घरोघरी भेटी देण्यात आल्या व याद्वारा मृत, स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. यातून मतदार संख्या कमी झाल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.



Labels: , ,

आज का राशिफल | Today Horoscope 26 November 2023: Forecast For All Zodiac Signs



Labels: , ,

दर्यापुरात एकाच परिसरातील चार घरे फोडली; पोलिसांपुढे आव्हान


 दर्यापूर
: स्थानिक नगर परिषदेजवळील शिक्षक कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री चार घरे फोडून चोरट्यांनी रोकड व दागिने चोरून नेले.हरिनारायण राजाराम मंडवे (रा. शिक्षक कॉलनी) हे मुलाचा अपघात झाल्याने रुग्णालयात आहेत. घरातील कपाटामधून सोन्याची नथ, तोरड्या, काही रोकड चोरीला गेली. शिक्षक सोमवंशी यांचे भाडेकरी दामोदर चांदूरकर यांचे बंद घर फोडून कपाट व इतर ठिकाणी ठेवलेले पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीची लक्ष्मी मूर्ती, गणपती, तोरड्या तसेच ११ हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, वरच्या मजल्यावर घरमालक व खाली आणखी भाडेकरी असतानासुद्धा आवाज झाला नाही. तिसरी चोरी नुरोद्दीन कदीरोद्दीन यांच्याकडे झाली. भाडेकरूच्या खोलीची कडी लावून चोरट्यांनी नुरोद्दीन यांच्या घरात प्रवेश केला.त्यांच्या घरातून दहा हजार रुपये लंपास झाले आहेत. याच ठिकाणी चौथे घरसुद्धा चोरट्यांनी फोडले. परंतु, घरमालकाची तक्रार प्राप्त झाली नाही. पोलिसांची गस्त असतानादेखील घरफोड्या कशा होतात, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

घरफोड्यांची पुनरावृत्ती

दोन महिन्यांपूर्वी दर्यापुरात चार ते पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता चार ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


कलीम शाह जलील शाह (३२, रा. सुफी प्लॉट, दर्यापूर) या मागील रेकॉर्डवरील आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानेच घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शहरातील काही चोयांची माहिती घेण्यात येत आहे. - संतोष ताले, ठाणेदार

Labels: , ,

अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान



 अमरावती : काँग्रेस आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्ष संविधानाने आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करीत आहेत. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला राहुल गांधी यांनी शुभेच्छा देऊन संविधानाप्रति श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. त्या भूमिकेवर ठाम राहत अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या आ.अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली. २०१४ पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता माजवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल, तर देशाचे संविधान हे एकच सशक्त उत्तर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला, तर तो नेहमीच प्रगतिपथावर राहील. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र, देशात शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही. त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया आ. ठाकूर यांनी व्यक्त केली. संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे. या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते, याचा गाढ विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण 'घर घर संविधान' हे अभियान जिल्ह्यात राबवणार असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Labels: , ,

ज्याला टिपायचे त्याला योग्यवेळी टिपतो; देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

 

मुंबई :- उद्धव ठाकरे हे स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणुन ते सर्व गोष्टी एका फोटोग्राफरच्या नजरेतून बघत असतात. मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे मी माझ्या सामान्य दृष्टीकोणातून बघत असतो. पण शेवटी ते काही गोष्टी कॅमेऱ्यातून टिपून घेतात. मात्र मी सामान्य असल्याने योग्य टप्प्यात आल्यानंतर काय काय टिपायचे हे मला माहिती आहे. त्यामुळे ज्याला टिपायचे आहे त्याला मी योग्यवेळी टिपतो, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ. पांडा यांच्या वाइल्ड लाइफ फोटोंच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस  माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले डॉ. रमाकांत पांडा यांची हार्ट सर्जन म्हणून ओळख आहे. परंतु तेवढेच ते सिद्धहस्त चित्रकार देखील आहेत. विशेषतः वाइल्ड लाइफमध्ये त्यांनी सुंदर फोटो टिपले आहेत. आज ती सगळी चित्र बघायला मिळाली. ही प्रदर्शनी बघितल्यानंतर मला असे वाटते की, अतिशय सुंदर आपल्या निसर्गाचं वैविध्य त्यांनी आपल्या कॅमेरातून टिपले आहे. निसर्गातील प्राणी त्यांनी टिपून जनतेच्या नजरेसमोर आणले आहे. हे सर्व करत असताना त्यांना जो काही मोबदला मिळतो ते दान करतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी चित्र प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर जंगलाना वाचवले पाहीजे असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जंगलाना वाचवले पाहिजे यामध्ये माझे काही दुमत नाही. पण २०१४ ते २०१९ पर्यंत मी मुख्यमंत्री असताना त्या पाच वर्षांत फॉरेस्ट कव्हरेजमध्ये वाढ केली असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

Labels: , ,

पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर टीका

 

मुंबई :- मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही ठिकठिकाणी सभा घेत जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहेत. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही घेण्यास ते मागेपुढे बघतात, असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जरांगेला लक्ष्य केले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते. मात्र काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या असून त्यांच्या सांगण्यानुसार ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचे नावही घेत नाहीत. मात्र, यांना आरक्षण पाहिजे… असे काय चालेल? असा सवाल करत ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Labels: , , ,

AMRAVATI POLICE | शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी जेरबंद

अमरावती/प्रतिनिधी:-शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी असलेल्या अट्टल चोरट्यांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.सदर आरोपींपासून शहरातील पाच गुन्हे उघड झाले असून चोरट्यांकडून तीन लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज पत्र परिषदेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली.
शंकर सुभाष बनसोड व ४२ वर्ष रा. भीम नगर अमरावती,परमेश्वर अशोक सुखदेवे व १९ रा. केडिया नगर अमरावती व पंकज राजू गोंडाने व २७ वर्ष रा.चौरे नगर अमरावती असे अटक करण्यात आलेल्या तीनही अट्टल चोरट्यांची नावे आहे.सदर आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध ठाणे अंतर्गत येणार्‍या परिसरांमध्ये बंद घरांना निशाणा बनवून घरफोडी करीत होते.अशातच त्यांनी दिवाळीच्या वेळी सुद्धा घरफोडी केली.गुप्त माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी अतिशय मेहनतीने या तीनही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले.
चोरट्यांनी शहरातील राजापेठ मध्ये तीन बडनेरा मध्ये एक व नांदगाव पेठ मध्ये एक झालेल्या घरफोडीचे गुन्हे कबूल केले आहे तर आतापर्यंत तीनही आरोपींनी शहरातील तब्बल १५ घरफोडी केल्या आहेत.आरोपींमधून शंकर बनसोड व पंकज गोंडणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून परमेश्वर सुखदिवे याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यात आरोपी पंकज गुंडाणे हा ११ ऑक्टोंबर रोजी नागपूर जेलमधून सुटला तेव्हापासून तो सतत अमरावती शहर,अमरावती ग्रामीण, तसेच नागपूर शहरात चोरी घरफोडीचे गुन्हे करत आहे.सदर आरोपी हा पोलीस कोठडी मध्ये असून त्याच्याकडून अन्य माहिती घेणे सुरू आहे.आरोपींपासून आणखी दहा ते पंधरा अधिक गुन्हे उघडकीस येऊन मुद्देमाल मिळण्याची शक्यता पोलिसांनी दर्शविली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी,पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त शिवाजी बचाटे, प्रभारी कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, गंगाधर जाधव, छोटेलाल यादव,सागर सरदार, निलेश गुल्हाने, दिनेश भिसे, प्रशांत गिरडे, नरेश मोहरील, शेख वकील यांनी केली.

Labels: , ,

DELHI | तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे? : बिल गेट्स

नवी दिल्ली : माणसांच्या कामांचे तास किती असावेत? यावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की तीन दिवसांचा आठवडा असला तरीही ठीक आहे. तसेच एआयबद्दलही त्यांनी भाष्य केले. AI मुळे तुमची नोकरी जाईल असे नाही मात्र यामुळे गोष्टी बदलतील इतके नक्की असे ही गेट्स यांनी म्हटले. दक्षिण आफ्रिकेचे विनोदी कलाकार आणि लेखक ट्रेव्हर नोह यांच्या पॉडकास्ट 'व्हॉट नाऊ'मध्ये बोलताना त्यांनी यावर  भाष्य केले. 
 तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे?
 बिल गेट्स म्हणाले,'' तीन दिवसांचा आठवडा असेल तरीही काही हरकत नाही.नोकऱ्यांमध्ये AI सारखे कृत्रिम तंत्रज्ञान येत आहे त्याविषयी काय सांगाल? असे  विचारले असता बिल गेट्स म्हणाले एक दिवस असाही येऊ शकतो की खूप मेहनत करावी लागणार नाही. आपल्या जगतात अशी एक वेळ येऊ शकते की आठवड्यातले तीन दिवसच काम केले तरीही चालणार आहे. काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी युवकांनी ७० तास काम केले पाहिजे असे  म्हटले होते. त्यानंतर आता बिल गेट्स यांचे हे वक्तव्य चर्चेत आले.
 एक असेही जग असू शकते जिथे मशीन द्वारे जेवण तयार केले जाईल, जीवनावश्यक वस्तू तयार केला जातील आणि लोकांना आठवड्यात पाच दिवसांऐवजी फक्त तीन दिवस काम करावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत बिल गेट्स म्हणाले की, याचा प्रभाव नक्कीच मोठा पडणार आहे. मात्र माणसांचे काम AI संपवणार नाही. कामाच्या पद्धतींमध्ये बदल किंवा ज्याला फरक म्हणता येतील असे होतील, असे ही बिल गेट्स म्हणाले.
 लोकांना कमी कालावधीसाठी काम करु देण्यास हरकत नसलेले बिल गेट्स हे एकमेव व्यावसायिक नाहीत. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनीही साडेतीन दिवसांचा आठवडा आणि बाकी सुट्ट्या असतील असे एक वक्तव्य केले होते.इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा विचार करायला हवा अशी टिप्पणी केल्यानंतर ऑनलाइन वादाला तोंड फुटले होते. 
 पॉडकास्टमध्ये, मूर्ती म्हणाले होती की, भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी, तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करणे आवश्यक आहे. नारायण मूर्ती यांच्या विधानावरून वाद सुरु असताना सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती हे स्वतः आठवड्यातून ८० ते ९० तास काम करतात असे म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. तर अन्यही काही व्यावसायिकांनी मूर्ती यांच्या विधानाला अनुमोदन दिले होते. तर काहींनी त्यांना विरोध दर्शवला होता. बिल गेट्स यांच्या वक्तव्यामुळे नारायण मूर्ती यांच्या त्या वक्तव्याची पुन्हा एकदा नेटिझन्सना आठवण झाली.

Labels: , ,

Badnera | मध्य रेल्वेच्या बडनेरा मार्गे महापरिनिर्वाण दिनासाठी १० विशेष गाड्या, ४ ते ८ डिसेंबर दरम्यानचे वेळापत्रक जाहीर...

अशा धावतील विशेष गाड्या -
- ट्रेन क्र. ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ८ वाजता सुटेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी १५.५० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२४९ मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ९.३० पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५१ ही ६ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५३ ही ७ डिसेंबर रोजी दादर येथून १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५५ ही ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.०० वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. ०१२५७ ही ८ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५९ ही ८ डिसेंबर रोजी दादर येथून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल
- सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र. ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १३.३० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल.

Labels: , ,

Friday, November 24, 2023

BHATKULI | कृषी कार्यालय भातकुलीवर नितीन कदम यांची शेकडो शेतकऱ्यांसह धडक मोहीम


कृषीकार्यालय भातकुलीवर नितीन कदम यांची शेकडो शेतकऱ्यांसह धडक मोहीम
शेतकऱ्यांचा पिकविमा प्रश्न पेटला

स्थानिक बडनेरा ग्रामीण भागातील भातकुली तालुक्यामध्ये शेतकरी वर्गाला विवीध नैसर्गिक - अनैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. विवीध माध्यमातून ते आपल्या निदर्शनास येते.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात शासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.पंचनामे झाल्यानंतरही नुकसाभरपाईची रक्कम मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी असताना दरम्यान शासनाने व पिकविमा कंपन्यांनी नुकताच पीकविमा रक्कम जाहीर केली. यावेळी नुकसाभरपाईची रक्कम ऐकताच शेतकरी अवाक झाले. या अग्रिम रकमेत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे आढळून आले. अमरावती जिल्ह्यासाठी केवळ ८ लक्ष रुपयांची रक्कम जाहीर करण्याचे परिपत्रक जाहीर झाले. प्रत्येकी शेतकऱ्याला मिळणारी रक्कम ही केवळ ७८ रुपये इतकी असुन शेतकरी वर्गात खळबळ उडाली.*
*संबधीत बाब समाजसेवी नितीन कदम यांच्या निदर्शनास येताच शेकडो शेतकऱ्यांसमवेत तालुका कृषी कार्यालयावर धडक मोहीम राबवत सर्वांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यासोबत कश्या प्रकारे अन्यायकारक भूमिका शासन घेत आहे ? याबद्दल जाब विचारत पिकविमा रक्कम वाढवून देण्याचे निवेदन नितीन कदम यांच्या नेतृत्वात देण्यात आले.*
*शासनाने मंजूर केलेल्या १७०० कोटी रुपयांचा अग्रिम पिकविमा हा जाहीर केला. त्या पिकविमा रकमेमध्ये अमरावती जिल्हाच्या नावे फक्त ८ लक्ष रुपये देण्यात आली. त्या ८ लक्ष रकमेमध्ये शेतकऱ्यांची संख्या १०२६५ एवढी असून असुन म्हणजे प्रत्येकी ७८ रुपये येत आहे. सदर पिकविम्याची रक्कम अमरावती जिल्ह्याकरिता जाहीर करत शासनाने स्थानिक शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केले.* *यामध्ये सुधारणा करून शासनाचे आश्वासन केलेली २५ % रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात यावी त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळावा यासंदर्भातील निवेदन नितीन कदम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांसह देण्यात आले.*
*यावेळी स्वप्निल मालधुरे, आकाश पाटील,अभिषेक सवाई, सागर पंचबुद्धे, विनोद पतलीया, प्रफुल्ल महल्ले, दिनू ठाकरे, सोपान भटकर, आकाश बांबर, सागर बारब्दे, मोहन भातकुलकर, परेश मोहोळ, आनंद मोहोड, सचीन देशमुख, राहुल वानखडे, बाबूराव वानखडे, धीरज देशमुख, जयंत पवार, गजानन लेंडे, शंकर बरडे, बंशिभाऊ लाठी, गजानन सवाई, किशोर सरोदे, अर्पण भजभुजे, आकाश मानकर, गोपाल रौराडे, संदीप कोलटेके, भोजराज कोलटेके, प्रदीप मोहोड, गोलू वाघ, श्रीकांत सवाई, संजय सवाई, अशोक झाडे, भुवन दहिकर, सूरज पवार, आनंद ठाकरे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

Labels: , ,

आज का राशिफल



Labels: , ,