BHATKULI | भाजपा भातकुली तालुक्याच्या वतीने भातकुली येथील ठाणेदार यांना निवेदन
_दे धडक बे धडक_ हरीश मोहन राठी_7447282946
करजगाव : तालुक्यातील कुन्हा देशमुख येथील बोगस डॉक्टरच्या तक्रारीपश्चातही त्याची प्रॅक्टिस सुरूच असल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. चांदूर बाजार तालुक्यात कुन्हा देशमुख येथे देबाशिष सिकंदर हा स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत गेल्या २० वर्षांपासून मूळव्याधसह इतर आजारांवर उपचाराचा बनाव करीत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत कुठली जीवितहानी झाली नसली तरी या अज्ञानी व्यक्तीमुळे शक्यता केव्हाही खरी होऊ शकते. संबंधित व्यक्तीबाबत तक्रार केली असता, आरोग्य विभागाने कुन्हा देशमुख गाठले होते. त्यावेळी देबाशिषने पलायन केले होते. मात्र, तेव्हापासून आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे वळून पाहिले नाही. परिणामी बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस जोरात आहे. तालुका आरोग्य प्रशासन कारवाईबाबत उदासीन असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली आहे.
आरोग्य विभागाची चमू गेली असता, तो बोगस डॉक्टर मिळाला नाही तसेच दवाखाना असल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चमू पाठवून पाहणी करणार आहे. बोगस डॉक्टर मिळाल्यास नक्की कारवाई केली जाईल.
डॉ. ज्योस्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, CRIME NEWS, DAILY NEWS
अमरावती : जिल्हा प्रशासनाद्वारा ९ डिसेंबरपर्यंत दर शनिवारी व रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. याचदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन मतदार यादीचे वाचन होईल व याद्वारे आवश्यक दुरुस्ती करून अचूक मतदार यादी करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी सांगितले. यावेळी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय उपस्थित होत्या. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादीत १८ वर्षांवरील नागरिकांचा समावेश असला पाहिजे. यामध्ये कुणीही वंचित राहायला नको. याशिवाय स्थलांतरित व अन्यत्र रहिवासी नागरिकांची नावे वगळणे महत्त्वाचे आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटीदरम्यान त्यांना मतदार, मृत, स्थलांतरित नागरिकांची माहिती देऊन सहकार्य करावे. एकदा उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदार यादीमध्ये बदल करण्यात येणार नसल्याचे कटियार म्हणाले.शाळा, महाविद्यालयांत कॅम्प सुरू असून, १८ वर्षांचे झालेले व होत असलेल्या मतदारांच्या नावनोंदणीचा व्यापक कार्यक्रम सुरू आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, रणजित भोसले, अनिल भटकर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख उपस्थित होते.
मतदार यादीचे शुद्धीकरण, आठ हजार मतदार कमी
जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये २५,००,५८० मतदार होते व २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २३,९२,५३५ मतदार संख्या आहे. या १० महिन्यांत तब्बल ८०४५ मतदार कमी झाले. बीएल- ओंद्वारा घरोघरी भेटी देण्यात आल्या व याद्वारा मृत, स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. यातून मतदार संख्या कमी झाल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, DAILY NEWS, POLITICAL NEWS
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, DAILY NEWS, HOROSCOPE
घरफोड्यांची पुनरावृत्ती
दोन महिन्यांपूर्वी दर्यापुरात चार ते पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता चार ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कलीम शाह जलील शाह (३२, रा. सुफी प्लॉट, दर्यापूर) या मागील रेकॉर्डवरील आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानेच घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शहरातील काही चोयांची माहिती घेण्यात येत आहे. - संतोष ताले, ठाणेदार
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, CRIME NEWS, DAILY NEWS
अमरावती : काँग्रेस आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्ष संविधानाने आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करीत आहेत. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला राहुल गांधी यांनी शुभेच्छा देऊन संविधानाप्रति श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. त्या भूमिकेवर ठाम राहत अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या आ.अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली. २०१४ पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता माजवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल, तर देशाचे संविधान हे एकच सशक्त उत्तर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला, तर तो नेहमीच प्रगतिपथावर राहील. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र, देशात शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही. त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया आ. ठाकूर यांनी व्यक्त केली. संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे. या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते, याचा गाढ विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण 'घर घर संविधान' हे अभियान जिल्ह्यात राबवणार असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, DAILY NEWS, POLITICAL NEWS
मुंबई :- उद्धव ठाकरे हे स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणुन ते सर्व गोष्टी एका फोटोग्राफरच्या नजरेतून बघत असतात. मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे मी माझ्या सामान्य दृष्टीकोणातून बघत असतो. पण शेवटी ते काही गोष्टी कॅमेऱ्यातून टिपून घेतात. मात्र मी सामान्य असल्याने योग्य टप्प्यात आल्यानंतर काय काय टिपायचे हे मला माहिती आहे. त्यामुळे ज्याला टिपायचे आहे त्याला मी योग्यवेळी टिपतो, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ. पांडा यांच्या वाइल्ड लाइफ फोटोंच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले डॉ. रमाकांत पांडा यांची हार्ट सर्जन म्हणून ओळख आहे. परंतु तेवढेच ते सिद्धहस्त चित्रकार देखील आहेत. विशेषतः वाइल्ड लाइफमध्ये त्यांनी सुंदर फोटो टिपले आहेत. आज ती सगळी चित्र बघायला मिळाली. ही प्रदर्शनी बघितल्यानंतर मला असे वाटते की, अतिशय सुंदर आपल्या निसर्गाचं वैविध्य त्यांनी आपल्या कॅमेरातून टिपले आहे. निसर्गातील प्राणी त्यांनी टिपून जनतेच्या नजरेसमोर आणले आहे. हे सर्व करत असताना त्यांना जो काही मोबदला मिळतो ते दान करतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी चित्र प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर जंगलाना वाचवले पाहीजे असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जंगलाना वाचवले पाहिजे यामध्ये माझे काही दुमत नाही. पण २०१४ ते २०१९ पर्यंत मी मुख्यमंत्री असताना त्या पाच वर्षांत फॉरेस्ट कव्हरेजमध्ये वाढ केली असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, DAILY NEWS, POLITICAL NEWS
मुंबई :- मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही ठिकठिकाणी सभा घेत जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहेत. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही घेण्यास ते मागेपुढे बघतात, असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जरांगेला लक्ष्य केले.
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते. मात्र काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या असून त्यांच्या सांगण्यानुसार ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचे नावही घेत नाहीत. मात्र, यांना आरक्षण पाहिजे… असे काय चालेल? असा सवाल करत ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, CRIME NEWS, DAILY NEWS, POLITICAL NEWS
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, CRIME NEWS, DAILY NEWS
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, DAILY NEWS, POLITICAL NEWS
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, CRIME NEWS, DAILY NEWS
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, DAILY NEWS, POLITICAL NEWS
Labels: AMRAVATI CITY NEWS SPECIAL, DAILY NEWS, HOROSCOPE