Wednesday, December 20, 2023

गुरुदेवनगर, शेंदोळा खुर्दला - एकाच रात्री चार घरफोड्या - कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रनजर

amravaticitynews.com


तिवसा : थंडीत ग्रामीण भागातील परिसरात लवकरच शांतता पसरते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घरांना टार्गेट करणे सुरू केले आहे. तिवसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुरुदेवनगर व शेंदोळा खुर्द येथे एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याची घटना रविवारी - उघडकीस आली. विशेष म्हणजे चारही घरातील सदस्य बाहेरगावी असल्याने दिवसा रेकी करून मध्यरात्री ही कुलूपबंद घरे फोडण्यात आली आहे.

गुरुदेवनगर येथील नरेंद्र कर्डिले हे - उपचारासाठी बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली. तसेच व्ही. टी. - इंगळे यांचे घर फोडण्याचा प्रयत्न - केला असता शेजाऱ्यांच्या सतर्कतेने - चोरट्यांचा डाव फसला.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

-

भाडेकरूसंबंधी आवश्यक माहिती ठेवा

अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देता वैयवित्तक माहिती देऊ नये, तसेच बाहेरगावी जातांना शेजारच्यांना कल्पना द्यावी. ग्रामीण भागातही खासगी तसेच शासकीय नोकरीत समाविष्ट असलेल्या भाडेकरूंची संख्या भरपूर आहे. तेव्हा घरमालकांनी भाडेकरूसंबंधी माहिती, त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड आदींचा तपशील संग्रहित ठेवावा, असे आवाहन तिवसा पोलिसांकडून करण्यात आले.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

Labels: , , ,

Tuesday, December 19, 2023

विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले

 


AMRAVATI CITY NEWS BREAKING
विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले


The leopard caught from the Vidarbha college premises has now been released in its natural habitat

Labels: , , ,

जितकी पाऊले चालले, तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल ! पं. मिश्रा यांनी दाखवला भक्तिमार्ग ; शिव महापुराणाचा दाखला




अमरावती दि. 19 : अमरावतीच्या श्री हनुमान गढी येथे आयोजीत पं. प्रदीप मिश्रा यांच्या अंबा अंबेश्वर शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पं. मिश्रा यांनी शिव महापुराणाचे दाखले देत भक्तांना भक्तिमार्ग दाखवला. या कथेसाठी दूर-दुरून पायी चालत आलेल्या भक्तांना ते कथास्थळ पर्यंत जितकी पाऊले चालत आले आहेत त्यांना तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल असे त्यांनी सांगिले. शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करण्यासाठी तुम्ही आपल्या घरापासून शिव मंदिरापर्यंत जितकी पावले चालत जाल भगवान शिवही तुमच्या तितकेच जवळ येतील असे पं. मिश्रा यांनी सांगितले. श्री हनुमान गढी येथे आयोजीत या शिवमहापुराण कथेला उसळलेल्या लाखो भक्तांच्या गर्दीमुळे आज पर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

amravaticitynews.com


आज-काल माणुसकी हि शेअर मार्केट प्रमाणे खाली येत आहे. उंच आकाशात भरारी घेणे हा गुण निसर्गात वावरणाऱ्या पक्ष्यांचा आहे तर दुसरीकडे भरारी घेणाऱ्याला खाली खेचण्याचा गुण माणूस या जातीने विकसित केला आहे. माणूस हा माणसाचे जीवन जगणेच विसरत चालला आहे. परंतु कुठलीच जादूची छडी किंवा कोणतेच महाराज धनवर्षा करू शकत नाहीत. प्रत्येकाला आप-आपले भोग स्वतःच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे दुःख तुमचे तर तुम्हालाच शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करावे लागेल. असे पं. प्रदीप मिश्रा म्हणाले. सनातन धर्म,संस्कृती,हिंदू धर्म रूढी व परंपरा हेच वैश्विक सत्य असून,भक्ती शक्ती चा अनोखा संगम हा केवळ आपल्या धर्मातच बघायला मिळते. भगवान शिव हे देवाधिदेव महादेव असून भक्तांच्या संकट निवारणासाठी शिवआराधना हा अत्यंत सहज सोपा व सरळ मार्ग असून एक लोटा जल हर समस्या का हल हा मूलमंत्र प्रत्येक धर्मप्रेमी व सनातनी भक्ताने अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या प्रवचनातून केले. दुसऱ्या दिवशीच्या या शिवमहापुराण कथेचा समारोप लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत महिला सफाई कर्मचारी, स्वच्छता दुत व खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी आमदार दिलीप सानंदा, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांचे हस्ते आरती करून झाला.
राजसत्तेला ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच

राजसत्तेला वेळो-वेळी ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच होय. राजसत्तेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा-तेव्हा अनेक संत, तपस्वी आदींनी राजसत्तेला सावरण्याचे, राजसत्तेची ताकद वाढवण्याचे काम केले आहे. शास्त्रातही याचे कित्येक प्रमाण आहेत. आणि आज राजसत्तेला संतांच्या ज्ञानाची व पाठबळाची नितांत गरज असल्याचे पं. मिश्रा यांनी सांगितले.
मला तपोवनेश्वर घेऊन चला

अंबानगरी अमरावतीच्या पावन भूमीत आल्याचे सौभाग्य लाभले हे माझे भाग्य आहे. या पावन भूमीतील तपोवनेश्वर येथे महान तपस्वी संघऋषी यांची शिव आराधना भूमी आहे. मी सर्वत्र भ्रमण केले परंतु आजपर्यंत कधीच तपोवनेश्वर येथे जाण्याचा योग आला नाही. परंतु आता मला तपोवनेश्वरला घेऊन चला अशी जाहीर ईच्छा पं. प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली. यावेळी खा. नवनीत राणा यांनी श्री हनुमान गढी हि तपोवनेश्वर पासून दूर नसल्याचे सांगून त्यांची तपोवनेश्वर दर्शनाची ईच्छा पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली

शनिवारी शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची उसळलेली अलोट गर्दी बघता आयोजकांनी रात्रीच अतिरिक्त पेंडॉल, आसन व्यवस्था उभी केली. परंतु रविवारीही उसळलेल्या लाखोंच्या गर्दीपुठे आयोजकांची अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली. या संपूर्ण परिसरात जिथवर नजर जाईल तिथवर सगळीकडे जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, बाल-गोपाल,आबाल-वृध्द शिवभक्तच नजरेस पडत होते.
प्रशासनाने व्यवस्था व सुविधा वाढवावी, नागरिकांनीही द्यावी वाहन सेवा
पं. प्रदीप मिश्रा यांनी कथेला उसळनारी गर्दी, शहरापासून दूर असलेले आयोजन स्थळ बघता भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाला येथील सुविधा व सुविधा वाढवण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे कथेला येणाऱ्यांनी व विशेषतः युवकांनीही रस्त्याने पायी येणाऱ्या भाविकांना आप-आपल्या वाहनावर बसवून कथास्थळापर्यंत आणण्याची सेवा देण्याचे जाहीर आवाहन केले.

Labels: , ,

दोन बिबटयाच्या झुंझीत एकाचा मृत्यू !विद्यापीठ परिसरात सापडला मृतदेह


amravaticitynews.com


अमरावती दि. 19 : शनिवारी रात्री विद्यापीठ परिसरातील टेकडीजवळ दोन बिबट आपसात भिडले. या झुंझीत एका नर बिबट्याचा मृत्यू झाला. विद्यापीठ-मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोल पंप समोरील टेकडी परिसरात मृत बिबट्याचा मृतदेह सापडला. घटनेच्या सूचनेवरून वन विभागाच्या पथकाने मृत नर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आले. मृतक बिबट्या हा भानखेडा परिसरातील असून तो विद्यापीठ परिसरात शिरल्याने विद्यापीठ परिसरातील नर बिबट्याने त्याचेवर हल्ला केला. यातच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. असा अहवाल वन विभागाने नोंदवला आहे. गेल्या काही महिन्यातील विविध घटनेत आतापर्यंत ७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्या माहितीनुसार विद्यापीठ परिसरात एक बिबट्याचा मृतदेह दिसून आल्याची माहिती रविवारी सकाळी साडेदहा वाजता वनविभागाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बिट, वनखंड 07 मधील मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोलपंप समोरील टेकडी परिसरात डांबरी रस्ता पासून अंदाजे 100 ते 150 मीटर अंतरावर बिबट (नर) मृत अवस्थेत दिसुन आला. तेथून ५० फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसले. मृत बिबटची प्राथमिक पाहणी केली असता त्याचे डोक्यावर ओरखडे, जिभ दातामध्ये दबलेली तसेच पंज्यावर व चेहऱ्यावर नखाने ओरडलाच्या खुणा दिसून आल्या. पशुचन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी (शल्य चिकत्सालय) डॉ. सागर ठोसर यांनी त्या नरबिबट मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. त्या बिबट्याच्या डोक्याच्या आतील भागात जखम झाल्याने त्याचे मेंदूत अतीरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बांबू गार्डन परिसरात वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आला.
वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्रच सुरु
गेल्या काही महिन्यापासून शहरात वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाले आहे. काही दिवसाआधीच एक बिबट ठार झाला, काल-परवा छत्री तलाव-भानखेडा मार्गावर एक रानमांजर गाडीखाली आल्याने चिरडल्या गेले तोच आता रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याचा मृतदेह सापडला. अमरावती जिल्ह्यातील दुसरा क्रमांकाचे वनक्षेत्र असलेल्या पोहरा-मालखेड जंगलात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांना त्यांचा हक्काचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊन जीव गमवावा लागत आहे. वन्य प्राण्यांच्या या मृत्यू सत्रासाठी येथील निंद्रिस्त्र प्रशाषणच जवाबदार असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी निलेश कांचनपुरे यांनी केला आहे.
आणखी किती वन्यजीवांचे बळी घेणार ?
अमरावती शहरालगत असलेल्या वडाळी, पोहरा, मालखेड या प्रादेशिक वनक्षेत्रामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी आढळून येत असून हे जंगल राखीव वनक्षेत्र म्हणून शासन दरबारी याची नोंद आहे परंतु गेल्या काही दिवसात या ठिकाणी स्थानिक राजकीय लोकांनी उच्छाद मांडल्यामुळे व विकाऊ वन अधिकाऱ्यांमुळे सदर जंगल सद्यस्थितीत स्मशान बनण्याच्या मार्गांवर असल्याचे दिसून येत आहे. जिथे सामान्य नागरिकांना एक झाड तोडल्यास शिक्षा होते त्याठिकाणी वन अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हजारो हेक्टर जंगल विनापरवानगी नष्ट करण्यात येत आहे. यामुळे येथील वन्यप्राणी विस्थापित होत असून गेल्या वर्षभरात 7 बिबट्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे व अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. एकीकडे शासन हेच प्राणी वाचविण्याकरिता करोडो रुपये खर्च करीत असल्याचे भासवीत असतांना केवळ पक्षाचे आमदार, खासदार व ताटाखालचे मांजर असलेले अधिकारी आहेत म्हणून कार्यवाही करणार नाही ही भूमिका जर शासनाची असेल तर सामान्य जनतेला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल व यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागेल अशी भूमिका वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी विषद केली


One died in a fight between two leopards! The body was found in the university premises
All

Labels: , , ,

अयोध्येचे स्वामी सत्येंद्र व हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज मंगळवारी अमरावतीत !



अमरावती दि. 19 : श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील बाबरी पतन ते भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर निर्माण या सर्व घडामोडींचे गेल्या 35 वर्षापासून अग्रणी शिलेदार असलेले स्वामी सत्येंद्रजी तसेच हनुमान गढी अयोध्याचे मुख्य महंत राजू दास महाराज हे मंगळवारी (ता.१९) अमरावतीत येत असून ते श्री हनुमान गढी अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजक आ.रवी राणा, खा. नवनीत राणा यांनी सांगितले.


श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्ला चे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी सदा अग्रसर असणारे स्वामी सत्येंद्रजी हे कट्टर हिंदुत्ववादी असून गेल्या 35 वर्षा पासून यासाठी कठीण संघर्ष त्यांनी केला आहे. बाबरी पतन,एका छोट्या तबुंत असलेली प्रभू श्री रामाची मूर्ती ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन यासाठी जे मोजके शिलेदार आहेत त्यापैकी एक स्वामी सत्येंद्रजी आहेत. तसेच महंत राजुदास महाराज हे हनुमान गढी अयोध्या चे मुख्य महंत असून त्यांनीच हनुमान गढी अमरावती येथे स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेसाठी श्री राम जन्मभूमी तसेच हनुमान गढी अयोध्या येथील पवित्र मातीचे कलश आमदार रवी राणा यांना सुपूर्द केले होते. मंगळवारी अमरावतीच्या हनुमान गढी येथे सुरु पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुरान कथेदरम्यान स्वामी सत्येंद्र व महंत राजूदास महाराज यांच्या दर्शनाचा लाभ लाखो भक्तांना घेता येईल असे आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा यांनी कळविले आहे.

 

Labels: , , , ,

फोनपे'त पैसे नव्हते म्हणून १५ ग्रॅमची चेन हिसकावली





अमरावती : एका तरुणाला धाक दाखवून त्याच्या फोन पे अकाउंटमध्ये पैसे नसल्याने त्याच्याकडील १५ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली. १६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास संविधान चौकात ही घटना घडली, निखिल खडसे (३०, रा. विलासनगर) याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सागर काकणे (रा. रमाबाई आंबेडकर नगर) व अनिकेत नामक तरुणाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला.
निखिल खडसे हा मित्राशी बोलत असताना तेथे आरोपी आले. त्यांनी निखिलला कॉल करण्यासाठी मोबाइल मागितला. ते मोबाइल घेऊन जाऊ लागल्याने निखिल व त्याचा मित्र सुद्धा सागरच्या मागे गेले. सागर काकणे व अनिकेत हे दोघे निखिल व त्याच्या मित्राला अंधारात घेऊन गेले. तेथे निखिलला पैशाची मागणी केली. त्याच्याकडे पैसे नसल्याने आरोपीने फोन पे जबरदस्तीने उघडायला लावले. परंतु अकाउंटला पैसे नसल्याने आरोपीने निखिलला मारहाण केली. तथा त्याच्या गळ्यातील चेन हिसकून नेली. निखिलच्या मित्राने पोलिसांच्या डायल११२ वर कॉल केला.


 

Labels: , , ,

ऑनलाइन फसवणुकीतील पैसे मिळणार तरी कसे? 'सायबर'चे मनुष्यबळ अपुरे : गुन्हेगार परराज्यांत; तक्रारींचा ओघ

अमरावती : कोरोना काळानंतर देशभरात लोकांकडून ऑनलाइन डिजिटल बँकिंगचा वापर अधिकाधिक केला जात आहे. ऑनलाइन खरेदीवरही नागरिक भर देऊ लागले आहे. यामुळे सायबर क्राइममध्येही वाढ होऊ लागली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष, भूलथापा देत, तर कधी भीती दाखवून परस्पर बैंक खात्यात लाखो ते कोट्यवधी रुपये वळवून फसवणूक केली जात आहे. गुन्हेगार परराज्यांतील असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सायबर पोलिसांना विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

रोज किती तक्रारी येतात?

शहर आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात दररोज विविध प्रकारच्या सरासरी दोन ते तीन तक्रारी येतात. तक्रारीचे स्वरूप बघून गुन्हे दाखल करून घेतले जातात. फसवणुकीसह सोशल मीडियाचे अकाउंट हॅकिंगच्या तक्रारी येतात.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

१६ कर्मचारी

पोलिस आयुक्तालयातील सायबर ठाण्यात १६ अंमलदार आहेत. मात्र, त्यांनादेखील मर्यादा आहेत.सायबर पोलिस ठाण्यात मनुष्यबळ किती? एक पोलिस निरीक्षक १ एपीआय, एक पीएसआयसायबर ठाण्याकरिता एक पोलिस निरीक्षक आहे. ती ठाणेदारी गजानन तामटे यांच्याकडे आहे.सायबर ठाण्यात एक सहायक पोलिस निरिक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक आहे.

अडचणी काय?

आरोपी एकच, गुन्हे अधिक: कधी-कधी सायबर गुन्हेगार एकच असतो; मात्र त्याच्यावरगुन्हे वेगवेगळे असतात. सायबर गुन्हेगाराचा माग काढताना त्यामुळे अडचणी उद्‌भवतात.तपासाचे धागेदोरे परराज्यांत: सायबर गुन्ह्यांच्या सर्वच तपासाचे धागेदोरे हे महाराष्ट्राच्या  बाहेर असल्याचे समोर येते. यामुळे या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रदेशांत दौरे करावे लागतात.

बंदोबस्ताची जबाबदारी अधिवेशनासारखे मोठे कार्यक्रम असो किंवा मोठ्या राजकीय व्यक्तीचे दौरे असल्यास किंवा त्यांचे कार्यक्रम असल्यास शहराबाहेरच्या वाढीव बंदोबस्ताचाही ताण सायबर पोलिसांना झेलावा लागतो.

 कोर्टाच्या वाऱ्या : अनेकदा ठाणेदार व सहायक पोलिस निरीक्षकाला आरोपपत्र व अनुषंगिक कामासाठी न्यायालयात जावे लागते. कधीकाळी नागपूर उच्च न्यायालयाच्या वाऱ्यादेखील कराव्या लागतात. त्यामुळे तपासाला मर्यादा येतात.

गरज किती कर्मचाऱ्यांची?

दोन लाखांवरील फसवणुकीबाबतच्या तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र, अन्य सर्व तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. परिणामी, अधिक मनुष्यबळाची गरज आहे.सायबर ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी बहुतांश तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यात नोंदविल्या जातात. अलीकडे सायबर फसवणुकीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. गुन्हे निखंदूत काढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

Labels: , , ,

नाकाबंदीत धारणी पोलिसांनी रोखली ५८ गोवंशाची कत्तल


धारणी/अमरावती : मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात होणारी ५८ गोवंशाची वाहतूक, कत्तल धारणी पोलिसांनी रोखली. मध्य प्रदेश ते अकोट मार्गावर १७ डिसेंबरला झांझरी ठाणाजवळ नाकाबंदी करून ती कारवाई केली.

घटनास्थळाहून शेख असलम शेख हासम (३५), अन्सार खान समशेर खान (२२), कादिमोददीन इक्रामोददीन (३५), मो. सोहेल मो. सुलतान (३५), अरबाज खान अयुब खान (२५) व अ. शरीफ अ. लतिफ (३६,

रा. हिवरखेड, ता. आकोट, जि. अकोला) यांना ताब्यात घेतले. ते ५८ गोवंशांना अमानुषरीत्या एकमेकांना बांधून कत्तलीकरिता घेऊन जातांना मिळून आले. आरोपींकडून ७ लाख किमतीचे ५८ गोवंश व २.५० लाखांच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या, एसडीपीओ अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणीचे ठाणेदार अशोक जाधव, उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, रिना सदार, अंमलदार विनोद धर्माळे, साबुलाल दहीकर, संजय मिश्रा, प्रेमानंद गुडधे, जगत तेलगोटे, मोहित आकाशे, राम सोळंके आदीनी केली.

Labels: , , ,

Sunday, November 26, 2023

कुन्हा येथील 'त्या' बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस सुरूच आरोग्य विभाग पुन्हा पाठविणार चमू




करजगाव : तालुक्यातील कुन्हा देशमुख येथील बोगस डॉक्टरच्या तक्रारीपश्चातही त्याची प्रॅक्टिस सुरूच असल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. चांदूर बाजार तालुक्यात कुन्हा देशमुख येथे देबाशिष सिकंदर हा स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत गेल्या २० वर्षांपासून मूळव्याधसह इतर आजारांवर उपचाराचा बनाव करीत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत कुठली जीवितहानी झाली नसली तरी या अज्ञानी व्यक्तीमुळे शक्यता केव्हाही खरी होऊ शकते. संबंधित व्यक्तीबाबत तक्रार केली असता, आरोग्य विभागाने कुन्हा देशमुख गाठले होते. त्यावेळी देबाशिषने पलायन केले होते. मात्र, तेव्हापासून आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे वळून पाहिले नाही. परिणामी बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस जोरात आहे. तालुका आरोग्य प्रशासन कारवाईबाबत उदासीन असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली आहे.


आरोग्य विभागाची चमू गेली असता, तो बोगस डॉक्टर मिळाला नाही तसेच दवाखाना असल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चमू पाठवून पाहणी करणार आहे. बोगस डॉक्टर मिळाल्यास नक्की कारवाई केली जाईल.

डॉ. ज्योस्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार

Labels: , ,

दर्यापुरात एकाच परिसरातील चार घरे फोडली; पोलिसांपुढे आव्हान


 दर्यापूर
: स्थानिक नगर परिषदेजवळील शिक्षक कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री चार घरे फोडून चोरट्यांनी रोकड व दागिने चोरून नेले.हरिनारायण राजाराम मंडवे (रा. शिक्षक कॉलनी) हे मुलाचा अपघात झाल्याने रुग्णालयात आहेत. घरातील कपाटामधून सोन्याची नथ, तोरड्या, काही रोकड चोरीला गेली. शिक्षक सोमवंशी यांचे भाडेकरी दामोदर चांदूरकर यांचे बंद घर फोडून कपाट व इतर ठिकाणी ठेवलेले पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीची लक्ष्मी मूर्ती, गणपती, तोरड्या तसेच ११ हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, वरच्या मजल्यावर घरमालक व खाली आणखी भाडेकरी असतानासुद्धा आवाज झाला नाही. तिसरी चोरी नुरोद्दीन कदीरोद्दीन यांच्याकडे झाली. भाडेकरूच्या खोलीची कडी लावून चोरट्यांनी नुरोद्दीन यांच्या घरात प्रवेश केला.त्यांच्या घरातून दहा हजार रुपये लंपास झाले आहेत. याच ठिकाणी चौथे घरसुद्धा चोरट्यांनी फोडले. परंतु, घरमालकाची तक्रार प्राप्त झाली नाही. पोलिसांची गस्त असतानादेखील घरफोड्या कशा होतात, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

घरफोड्यांची पुनरावृत्ती

दोन महिन्यांपूर्वी दर्यापुरात चार ते पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता चार ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


कलीम शाह जलील शाह (३२, रा. सुफी प्लॉट, दर्यापूर) या मागील रेकॉर्डवरील आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानेच घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शहरातील काही चोयांची माहिती घेण्यात येत आहे. - संतोष ताले, ठाणेदार

Labels: , ,

पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर टीका

 

मुंबई :- मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही ठिकठिकाणी सभा घेत जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहेत. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही घेण्यास ते मागेपुढे बघतात, असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जरांगेला लक्ष्य केले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते. मात्र काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या असून त्यांच्या सांगण्यानुसार ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचे नावही घेत नाहीत. मात्र, यांना आरक्षण पाहिजे… असे काय चालेल? असा सवाल करत ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Labels: , , ,

AMRAVATI POLICE | शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी जेरबंद

अमरावती/प्रतिनिधी:-शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी असलेल्या अट्टल चोरट्यांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.सदर आरोपींपासून शहरातील पाच गुन्हे उघड झाले असून चोरट्यांकडून तीन लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज पत्र परिषदेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली.
शंकर सुभाष बनसोड व ४२ वर्ष रा. भीम नगर अमरावती,परमेश्वर अशोक सुखदेवे व १९ रा. केडिया नगर अमरावती व पंकज राजू गोंडाने व २७ वर्ष रा.चौरे नगर अमरावती असे अटक करण्यात आलेल्या तीनही अट्टल चोरट्यांची नावे आहे.सदर आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध ठाणे अंतर्गत येणार्‍या परिसरांमध्ये बंद घरांना निशाणा बनवून घरफोडी करीत होते.अशातच त्यांनी दिवाळीच्या वेळी सुद्धा घरफोडी केली.गुप्त माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी अतिशय मेहनतीने या तीनही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले.
चोरट्यांनी शहरातील राजापेठ मध्ये तीन बडनेरा मध्ये एक व नांदगाव पेठ मध्ये एक झालेल्या घरफोडीचे गुन्हे कबूल केले आहे तर आतापर्यंत तीनही आरोपींनी शहरातील तब्बल १५ घरफोडी केल्या आहेत.आरोपींमधून शंकर बनसोड व पंकज गोंडणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून परमेश्वर सुखदिवे याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यात आरोपी पंकज गुंडाणे हा ११ ऑक्टोंबर रोजी नागपूर जेलमधून सुटला तेव्हापासून तो सतत अमरावती शहर,अमरावती ग्रामीण, तसेच नागपूर शहरात चोरी घरफोडीचे गुन्हे करत आहे.सदर आरोपी हा पोलीस कोठडी मध्ये असून त्याच्याकडून अन्य माहिती घेणे सुरू आहे.आरोपींपासून आणखी दहा ते पंधरा अधिक गुन्हे उघडकीस येऊन मुद्देमाल मिळण्याची शक्यता पोलिसांनी दर्शविली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी,पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त शिवाजी बचाटे, प्रभारी कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, गंगाधर जाधव, छोटेलाल यादव,सागर सरदार, निलेश गुल्हाने, दिनेश भिसे, प्रशांत गिरडे, नरेश मोहरील, शेख वकील यांनी केली.

Labels: , ,

Badnera | मध्य रेल्वेच्या बडनेरा मार्गे महापरिनिर्वाण दिनासाठी १० विशेष गाड्या, ४ ते ८ डिसेंबर दरम्यानचे वेळापत्रक जाहीर...

अशा धावतील विशेष गाड्या -
- ट्रेन क्र. ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ८ वाजता सुटेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी १५.५० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२४९ मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ९.३० पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५१ ही ६ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५३ ही ७ डिसेंबर रोजी दादर येथून १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५५ ही ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.०० वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. ०१२५७ ही ८ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५९ ही ८ डिसेंबर रोजी दादर येथून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल
- सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र. ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १३.३० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल.

Labels: , ,

Friday, November 24, 2023

अमरावती शहर पुलिस ने खोज निकाला ६१ गुमशुदाओं को


ऑपरेशन मुस्कान रहा बेहद सफल १२ नाबालिगों के साथ ही ४९ लापता महिला व पुरुष खोजे गए

विगत १ नवंबर से २१ नवंबर के दौरान अमरावती शहर पुलिस ने ऑपरेशन मुस्कान के तहत लापता रहने वाले लोगों की तलाश करने का सघन अभियान चलाया, जो काफी सफल रहा. इस अभियान के तहत पुलिस ने १८ वर्ष से कम आयु वाले १२ नाबालिगों के साथ ही १८ वर्ष से अधिक आयु वाली ३८ युवतियों व महिलाओं तथा ११ पुरुषों को खोज निकाला. विशेष उल्लेखनीय है कि, ७ नाबालिगों की गुमशुदगी के मामलों की जांच करते हुए पुलिस ने ५ ऐसे नाबालिगों को भी खोज निकाला, जिनकी गुमशुदगी को लेकर पुलिस के पास कोई शिकायत ही दर्ज नहीं थी. इनमें फ्रेजरपुरा परिसर में रहने वाले ३ साल के मासूम बच्चे का भी समावेश है, . . इस संदर्भ में मिली जानकारी के मुताबिक पुलिस ने अपने पास दर्ज रहने वाली अपहरण व भगा ले जाने से संबंधित शिकायतों पर जांच करते हुए ७ नाबालिग खोज निकाले, जिनमें ६ लडकियों व १ लडके को खोजा गया. साथ ही इस दौरान ५ ऐसे नाबालिग भी खोजे गए, जिनके लापता होने की शिकायत दर्ज नहीं थी. इनमें ४ लडकियों व १ लडके का समावेश था. इसके अलावा १८ वर्ष से अधिक आयु गुट में ३८ युवतियों व महिलाओं तथा ११ पुरुषों को भी शहर पुलिस ने ऑपरेशन मुस्कान के तहत खोज निकाला, 


इस बारे में शहर पुलिस द्वारा दी गई जानकारी के मुताबिक पुलिस के पास दर्ज रहने वाले मामलों में से खोलापुरी गेट पुलिस थाना क्षेत्र से लापता १६ वर्षीय लड़की, गाडगे नगर थाना क्षेत्र से लापता रहने वाले १५ वर्षीय लडके व १४ वर्षीय लडकी, नांदगांव पेठ थाना क्षेत्र से लापता रहने वाली १४ वर्षीय लडकी, कोतवाली थाना क्षेत्र से लापता रहने वाली १४ वर्षीय व १७ वर्षीय लडकी एवं फ्रेजरपुरा थाना क्षेत्र से लापता रहने वाली १७ वर्षीय लड़की को खोज निकाला गया, जिसमें से १ लडकी को बाल कल्याण समिति के सुपूर्द किया गया, वहीं अन्य ६ नाबालिगों को उनके परिजनों के हवाले किया गया. इसके अलावा ऑपरेशन मुस्कान के दौरान गुमशुदा बच्चों की तलाश करते समय कोतवाली थाना क्षेत्र से लापता रहने वाली १६ वर्षीय लडकी, फ्रेजरपुरा थाना क्षेत्र से लापता रहने वाली ९ वर्षीय लडकी, बडनेरा थाना क्षेत्र से लापता रहने वाली १७ वर्षीय लडकी, गाडगे नगर थाना क्षेत्र से लापता रहने वाली १७ वर्षीय लडकी तथा फ्रेजरपुरा थाना क्षेत्र से लापता रहने वाले ३ वर्षीय मासूम बच्चे को भी खोज निकाला गया. जिनमें से २ लडकियों को बाल कल्याण समिति के सुपुर्द किया गया, वहीं अन्य तीनों नाबालिगों को उनके अभिभावकों के हवाले किया गया.

Labels: , ,

अमरावती शहरात कलम 37 (1) व (3) लागू

अमरावती, दि. 23 (Amravati City News):  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37(1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

         सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो  दि. 23 नोव्हेंबरचे  मध्यरात्रीपासून ते 7 डिसेंबर  2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

Labels: , ,

Thursday, November 23, 2023

अमरावती ग्रामीण एसपींचा मंत्र - 'बेसिक पोलिसिंग'



अमरावती : प्रत्येकाला समाजात निर्भय वाटावे, अशारितीने कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जाईल. त्यालाच आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही नवनियुक्त पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. बुधवारी दुपारी त्यांनी प्रभारी पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.विशाल आनंद यांना ग्रामीण पोलिसांनी सलामी दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'बेसिक पोलिसिंग'वर आपला भर राहील. त्यापुढे जाऊन युनिटी पोलिसिंग अंगीकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नागपूर येथील विशेष कृती गट, नक्षलविरोधी अभियानाचे अधीक्षक विशाल आनंद यांची अमरावती एसपी म्हणून बदली झाली. त्यानुसार ते बुधवारी येथे रूजू झाले. त्यांनी बंदची माहिती जाणून घेतली तथा शांततेचे आवाहन केले. अंतर्गत नियुक्ती ही मेरिटवर असेल. बेसिक प्रोफेशनल पोलिसिंग कसे करायचे, याकडे लक्ष दिले जाईल, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह पोलिसांच्या कल्याणाकडेही लक्ष दिले जाईल, असे एसपी विशाल आनंद म्हणाले.


सोशल मीडिया चॅलेंजिंग

अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणारे गुन्हे व शेअर फॉरवर्ड पोस्ट पोलिसांसाठी चॅलेंज झाले आहे. आक्षेपार्ह वा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टचे आयडेंटिफिकेशन, सोशल व्हायरलला अटकाव व जनजागृती अशा 'थ्री स्टेप अप्रोच'ने आपण त्याला अटकाव घालण्याचा प्रयत्न करू, असे एसपी म्हणाले.


सन २०१४ च्या बॅचचे आयपीएस असलेले विशाल आनंद सिंगुरी यांनी गतवर्षी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यकाळ गाजवला. यंदाच्या ३० ऑगस्टला त्यांची नागपूर येथील विशेष कृती गट, नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती.


Labels: , ,

Tuesday, November 14, 2023

Achalpur | अचलपूर शहरातील प्रसिद्ध श्री शनी मंदिरामध्ये चांदीचे मुकुट अज्ञात चोरट्यांनी केले लंपास ...

 अचलपूर - अचलपूर शहरातील चावलमंडी येथील प्रसिद्ध श्री शनी मंदिरामध्ये काल आज १४ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांनी श्री शनी मंदिर येथील श्री शनी भगवाणचे चांदीचे मुकुट लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.



प्राप्त माहितीनुसार,अचलपूर शहरातील प्रसिद्ध श्री शनी मंदिरामध्ये श्री शनी भगवान येथे जवळ्पास दीड किलोचे २ चांदीचे छत्र व मुकुट अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली आहे.आज अज्ञात चोरट्यानी चांदीचे छत्र व मुकुट लांबविल्याने अचलपूर शहरातील प्रसिद्ध श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती .यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .अचलपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी अचलपूर पोलीस दाखल होउन पुढील तपास सुरू आहे .या परिसरात लागलेले विविध सीसीटिव्ही कॅमेरे सुद्धा तपासले जात आहे .



Labels: , ,

AMRAVATI | अमरावती : तिकिटांचा काळाबाजार, ७७ जणांना अटक


अमरावती : लांब पल्‍ल्‍याच्‍या रेल्‍वे गाड्यांचे कन्‍फर्म तिकीट मिळवून देण्‍याच्‍या नावावर अनेक दलाल प्रवाशांची लूट करतात. असा काळाबाजार करणाऱ्या दलालांना आळा घालण्‍यासाठी रेल्‍वे पोलिसांनी कंबर कसली आहे. मध्‍य रेल्वेच्‍या भुसावळ विभागात एप्रिल ते ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीत तिकिटांच्‍या काळाबाजार प्रकरणी ७२ गुन्‍हे दाखल करण्‍यात आले असून ७७ जणांना अटक करण्‍यात आली आहे.
मध्‍य रेल्‍वेने आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध मोहीम तीव्र केली आहे. सायबर विभागाकडून मिळालेली माहिती आणि इतर पूरक माहितीच्‍या आधारे मध्‍य रेल्‍वेचे सुरक्षा पथक छापे टाकत आहे. मध्‍य रेल्‍वेने प्रवाशांना वैध रेल्‍वे तिकिटांसह प्रवास करण्‍याचे आवाहन केले आहे. अवैध ऑनलाईन तिकीट प्रकरणात गुंतलेल्‍या दलालांकडून तिकीट खरेदी करणे महागात पडू शकते. अशा तिकिटावर प्रवास केला जाऊ शकत नाही. कायदेशीर कारवाईमुळे तिकीट रद्द केल्‍यास आर्थिक नुकसानीचा फटका प्रवाशांना बसू शकतो.


Labels: , ,

Friday, November 10, 2023

Amravati | सोने-चांदीचा वर्क लागलेली मिठाई खा आणी स्वर्गात जा ! विषबाधा, त्वचारोग, अपचन व विविध आजारांची भीती



अमरावती दि. ९ : दिवाळी पर्वावर बाजारात सोने-चांदीचा वर्क असलेल्या आकर्षक मिठाई प्रकाराचे पीक आले आहे. परंतु सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई खाल्ल्यामुळे विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे. सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई खाल्ल्याने त्वचारोग, ऍलर्जी,अपचन व विविध आजारांची लागण होण्याचीही भीती आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी व खबरदारी म्हणून कोणताही वर्क चढवलेले अन्न पदार्थ खाणे टाळा, असा सावधगिरीचा  सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विनय करमकर यांनी दिला आहे.  

आयुर्वेदिक औषधांत सोने-चांदीचे भस्म वापरल्या जाते. आयुर्वेदाने त्याचे नेमके प्रमाण, भस्म बनवण्याची विधीही ठरवून दिलेली आहे. त्याचप्रकारे सोने-चांदीचे भस्मयुक्त ओषधी कधी खाव्या-कधी खाऊ नये, त्याचे प्रमाण किती असावे याचीही कडक नियमावली पाळावी लागते. अन्यथा त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आयुर्वेदात सोने-चांदीच्या भस्माला स्थान आहे खरे, परंतु सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई व अन्य अन्न पदार्थाचे सेवन करण्यास मात्र मनाई आहे. अश्यावेळी नागरिकांनी आनंदाच्या भरात सोने-चांदीचा वर्क लागलेल्या मिठाई खाल्ल्यामुळे अपचन होऊन विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. तसेच ऍलर्जी, पोटाचे विविध आजार व त्वचारोगांनाही यामुळे निमंत्रण मिळते. म्हणूनच दरवर्षी दिवाळीनंतर विविध आजार व त्वचारोगांनी ग्रस्त रुग्णाची संख्या वाढते. यात बालक-वृद्ध-गर्भवती महिला यांची संख्या जास्त असते. म्हणून आकर्षण व भ्रामक जाहिरातीच्या बळी न पडता सोने-चांदीचा वर्क लागलेले अन्न पदार्थ न खाल्लेलेच बरे असेही डॉ. करमकर यांनी  सांगितले. 


भस्माला दयावी लागते रेखापूर्णत्व चाचणी 

सोने किंवा चांदीचे भस्म तयार करण्यासाठीचे नियम कठीण आहेत. सदर भस्म तयार झाल्यावर त्याची रेखापूर्णत्व चाचणी करावी लागते.  जे भस्म मेटल डिटेक्टर टेस्ट पास करते अश्याच भस्माचा उपयोग खाण्यासाठी किंवा औषधीत करावा असे आयुर्वेदातही सांगितले आहे. तयार भस्माची राख बोटावर घ्यायची, त्यावर दुसरे बोट फिरवायचे दरम्यान ते भस्म बोटांच्या रेषांत दडून जाते. असे भस्मच आयुर्वेदिक औषधीत वापरल्या जाते. बोटावर घेतलेले भस्म जर बोटाना जरजरीत लागत असेल तर ते वापर मानवी शरीरास उपयोगी न पडता त्याचा फायदा होण्याऐवजी अपायच जास्त होतो. त्या भस्माचे प्रमाणही अत्यल्प ठेवावे लागते. उदा. १ मिलिग्रॅम सोने किंवा चांदीच्या भस्माच्या १० ते १५ किलो गोळ्या तयार कराव्या लागतात. त्यातही ते सोने-चांदी शुद्ध असणे बंधनकारक आहे.


...तर काजू कतली करेल हालत पतली 

सोने-चांदीचा वर्क असलेल्या मिठाई केवळ दिसण्यासाठी आकर्षक व आरोग्यासाठी बाधक ठरतात.सोन्याचा वर्क चढवून बनलेली खव्याची मिठाई, चांदीचा वर्क लावून तयार होणारी काजू कतली तयार करण्यासाठी जे सोने-चांदी वापरात आणल्या जाते ते १०० टक्के शुद्ध (२४ कॅरेट) असणे अत्यावश्यक आहे. कारण कोणताही वर्क लावलेलील्या मिठाईचे एक-दोन तुकडेच आपले शरीर पचवू शकते. सदर प्रमाण बिघडले तर आरोग्य बिघडण्याचीच शक्यता अधिक राहते. परिणामी सोन्याचा वर्क चढवून बनलेली खव्याची मिठाई, चांदीचा वर्क लावून तयार केलेली काजू कतली खाणार्यांची हालतच पतली करते. मिठाई व अन्न पदार्थातील भेसळ ओळखता येऊ नये यासाठीही त्यावर वर्क चढवल्या जातो. चांदीचा वर्क महाग पडत असल्याने चांदीऐवजी एल्युमिनियमचा वर्क वापरल्या जाते हे अनेकदा सप्रमाण उघड झाले आहे. अश्यावेळी सोन्याचा वर्क चढवलेली मिठाई तयार करतांना जास्त कमाईच्या लालसेपोटी अन्य पिवळ्या चकाकणाऱ्या धातूचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


वय व वातावरण बघूनच भस्म सेवनाचा सल्ला 

आयुर्वेदीक डॉक्टर रुग्णांना सोने-चांदी भस्मयुक्त औषधी देतांना त्यांचे वय, वातावरण आदी बाबींचा विचार करूनच सोने-चांदी भस्मयुक्त औषधी देतात. तरुण व शरीररष्ठी चांगली असलेल्या रुग्णांना ६० ते १२५ मिलिग्रॅम प्रमाणात भस्मयुक्त औषधी दिल्या जातात. हिवाळा असेल-रुग्णाची पाचन क्षमता  चांगली असेल तर १२५ मिलिग्रॅम प्रमाणात आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर मात्र ६० मिलिग्रॅम प्रमाणात सदर भस्मयुक्त औषधी दिल्या जातात. . 

मला त्यातले काहीच कळत नाही - जिल्हा शल्य चिकित्सक 

सोने-चांदीचा वर्क चढवलेले अन्न पदार्थ-मिठाई खाल्ल्याने त्याचा काय फायदा होतो किंवा त्याचे दुष्परीणाम काय आहेत. ही विचारणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांना करण्यात आली असता, मला त्यातले काहीच कळत नाही असे अबोध उत्तर डॉ. प्रमोद निरवणे यांचेकडून मिळाले. मानवी शरीर काय पचवते-काय नाही, काय खाल्ले तर उपाय होतो, काय खाल्ले तर अपाय याचेही समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाही. उलट तुम्ही अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारा असा सल्लाही यावेळी त्यांचेकडून मिळाला. 

शासनाची परवानगी म्हणून विक्रीची अनुमती - अन्न प्रशासन 

शासनाने सोने-चांदीचा वर्क चढवलेल्या मिठाई व अन्य अन्न पदार्थांच्या विक्रीस मनाई घातलेली नाही. त्यामुळे अन्न प्रशासन विभागातर्फे सोने-चांदीचा वर्क चढवलेल्या मिठाई व अन्य अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर निर्बंध घातल्या जात नाही. अशी माहिती अन्न व औषधी प्रशासन कार्यालयातील अन्न प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Labels: , ,

Paratwada police | शाळा फोडणारे चोर अटकेत, परतवाडा पोलिसांकडून काही तासात उकल

 अमरावती धामणगाव गढी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे कुलूप तोडून ५६,४०० रुपयांचे साहित्य लांबविणाऱ्या पाच चोरांना परतवाडा पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक आरोपींमध्ये अभिषेक सदांशिव, आदित्य नन्नावरे, महेश कांबळे, राज सदांशिव व हर्षल वाघमारे यांचा समावेश आहे. धामणगाव गढी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे कुलूप तोडून दोन एलईडी

टीव्ही, पेनड्राईव्ह असे साहित्य लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी ७ नोव्हेंबर रोजी परतवाडा ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान या गुन्ह्यात अभिषेकसह आदित्य, महेश, राज व हर्षल यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई परतवाडाचे ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सुधीर राऊत, उमेश सावरकर, मनीष काटोलकर, विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, जितेश बाबिल यांनी केली.


Labels: , ,