Wednesday, December 20, 2023

गुरुदेवनगर, शेंदोळा खुर्दला - एकाच रात्री चार घरफोड्या - कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रनजर

amravaticitynews.com


तिवसा : थंडीत ग्रामीण भागातील परिसरात लवकरच शांतता पसरते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घरांना टार्गेट करणे सुरू केले आहे. तिवसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुरुदेवनगर व शेंदोळा खुर्द येथे एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याची घटना रविवारी - उघडकीस आली. विशेष म्हणजे चारही घरातील सदस्य बाहेरगावी असल्याने दिवसा रेकी करून मध्यरात्री ही कुलूपबंद घरे फोडण्यात आली आहे.

गुरुदेवनगर येथील नरेंद्र कर्डिले हे - उपचारासाठी बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली. तसेच व्ही. टी. - इंगळे यांचे घर फोडण्याचा प्रयत्न - केला असता शेजाऱ्यांच्या सतर्कतेने - चोरट्यांचा डाव फसला.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

-

भाडेकरूसंबंधी आवश्यक माहिती ठेवा

अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देता वैयवित्तक माहिती देऊ नये, तसेच बाहेरगावी जातांना शेजारच्यांना कल्पना द्यावी. ग्रामीण भागातही खासगी तसेच शासकीय नोकरीत समाविष्ट असलेल्या भाडेकरूंची संख्या भरपूर आहे. तेव्हा घरमालकांनी भाडेकरूसंबंधी माहिती, त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड आदींचा तपशील संग्रहित ठेवावा, असे आवाहन तिवसा पोलिसांकडून करण्यात आले.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

Labels: , , ,

अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना अद्यापही कुलूप अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका



अमरावती : मानधन वाढीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील २३१३ अंगणवाडी सेविका व २३१३ मदतनीस, तसेच १४७ मिनी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून, पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील २५०० अंगणवाड्यांना 'टाळे' लागले आहे.

परिणामी, मुलांचा पोषण आहार, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चे काढण्यात आले, तसेच आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, शासन व प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यात अंगणावीडी सेविका, मिनी अंगणवाडी व सेविका, मदतनीस आदी सहभागी झाल्या आहेत. अंगणवाडी केंद्रात बालके पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे घेतात; परंतु अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पुकारलेल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. अंगणवाडीतून बालकांच्या कुपोषण मुक्तीसह त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, गरोदर माता, स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचे काम केले जाते. ही सर्व कामे ठप्प झाली आहेत.


या आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अंगणवाडी कर्मचऱ्यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्या, आहाराचा दर वाढून द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात.

अंगणवाडी सेविका, मदतनीस अनेक अडचणींचा सामना करत आहेत. आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.

-महेश जाधव,जिल्हाध्यक्ष अंगणवाडी बालकवाडी कर्मचारी युनियन



Labels: , ,

Tuesday, December 19, 2023

विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले

 


AMRAVATI CITY NEWS BREAKING
विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले


The leopard caught from the Vidarbha college premises has now been released in its natural habitat

Labels: , , ,

जितकी पाऊले चालले, तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल ! पं. मिश्रा यांनी दाखवला भक्तिमार्ग ; शिव महापुराणाचा दाखला




अमरावती दि. 19 : अमरावतीच्या श्री हनुमान गढी येथे आयोजीत पं. प्रदीप मिश्रा यांच्या अंबा अंबेश्वर शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पं. मिश्रा यांनी शिव महापुराणाचे दाखले देत भक्तांना भक्तिमार्ग दाखवला. या कथेसाठी दूर-दुरून पायी चालत आलेल्या भक्तांना ते कथास्थळ पर्यंत जितकी पाऊले चालत आले आहेत त्यांना तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल असे त्यांनी सांगिले. शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करण्यासाठी तुम्ही आपल्या घरापासून शिव मंदिरापर्यंत जितकी पावले चालत जाल भगवान शिवही तुमच्या तितकेच जवळ येतील असे पं. मिश्रा यांनी सांगितले. श्री हनुमान गढी येथे आयोजीत या शिवमहापुराण कथेला उसळलेल्या लाखो भक्तांच्या गर्दीमुळे आज पर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

amravaticitynews.com


आज-काल माणुसकी हि शेअर मार्केट प्रमाणे खाली येत आहे. उंच आकाशात भरारी घेणे हा गुण निसर्गात वावरणाऱ्या पक्ष्यांचा आहे तर दुसरीकडे भरारी घेणाऱ्याला खाली खेचण्याचा गुण माणूस या जातीने विकसित केला आहे. माणूस हा माणसाचे जीवन जगणेच विसरत चालला आहे. परंतु कुठलीच जादूची छडी किंवा कोणतेच महाराज धनवर्षा करू शकत नाहीत. प्रत्येकाला आप-आपले भोग स्वतःच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे दुःख तुमचे तर तुम्हालाच शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करावे लागेल. असे पं. प्रदीप मिश्रा म्हणाले. सनातन धर्म,संस्कृती,हिंदू धर्म रूढी व परंपरा हेच वैश्विक सत्य असून,भक्ती शक्ती चा अनोखा संगम हा केवळ आपल्या धर्मातच बघायला मिळते. भगवान शिव हे देवाधिदेव महादेव असून भक्तांच्या संकट निवारणासाठी शिवआराधना हा अत्यंत सहज सोपा व सरळ मार्ग असून एक लोटा जल हर समस्या का हल हा मूलमंत्र प्रत्येक धर्मप्रेमी व सनातनी भक्ताने अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या प्रवचनातून केले. दुसऱ्या दिवशीच्या या शिवमहापुराण कथेचा समारोप लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत महिला सफाई कर्मचारी, स्वच्छता दुत व खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी आमदार दिलीप सानंदा, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांचे हस्ते आरती करून झाला.
राजसत्तेला ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच

राजसत्तेला वेळो-वेळी ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच होय. राजसत्तेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा-तेव्हा अनेक संत, तपस्वी आदींनी राजसत्तेला सावरण्याचे, राजसत्तेची ताकद वाढवण्याचे काम केले आहे. शास्त्रातही याचे कित्येक प्रमाण आहेत. आणि आज राजसत्तेला संतांच्या ज्ञानाची व पाठबळाची नितांत गरज असल्याचे पं. मिश्रा यांनी सांगितले.
मला तपोवनेश्वर घेऊन चला

अंबानगरी अमरावतीच्या पावन भूमीत आल्याचे सौभाग्य लाभले हे माझे भाग्य आहे. या पावन भूमीतील तपोवनेश्वर येथे महान तपस्वी संघऋषी यांची शिव आराधना भूमी आहे. मी सर्वत्र भ्रमण केले परंतु आजपर्यंत कधीच तपोवनेश्वर येथे जाण्याचा योग आला नाही. परंतु आता मला तपोवनेश्वरला घेऊन चला अशी जाहीर ईच्छा पं. प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली. यावेळी खा. नवनीत राणा यांनी श्री हनुमान गढी हि तपोवनेश्वर पासून दूर नसल्याचे सांगून त्यांची तपोवनेश्वर दर्शनाची ईच्छा पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली

शनिवारी शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची उसळलेली अलोट गर्दी बघता आयोजकांनी रात्रीच अतिरिक्त पेंडॉल, आसन व्यवस्था उभी केली. परंतु रविवारीही उसळलेल्या लाखोंच्या गर्दीपुठे आयोजकांची अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली. या संपूर्ण परिसरात जिथवर नजर जाईल तिथवर सगळीकडे जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, बाल-गोपाल,आबाल-वृध्द शिवभक्तच नजरेस पडत होते.
प्रशासनाने व्यवस्था व सुविधा वाढवावी, नागरिकांनीही द्यावी वाहन सेवा
पं. प्रदीप मिश्रा यांनी कथेला उसळनारी गर्दी, शहरापासून दूर असलेले आयोजन स्थळ बघता भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाला येथील सुविधा व सुविधा वाढवण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे कथेला येणाऱ्यांनी व विशेषतः युवकांनीही रस्त्याने पायी येणाऱ्या भाविकांना आप-आपल्या वाहनावर बसवून कथास्थळापर्यंत आणण्याची सेवा देण्याचे जाहीर आवाहन केले.

Labels: , ,

दोन बिबटयाच्या झुंझीत एकाचा मृत्यू !विद्यापीठ परिसरात सापडला मृतदेह


amravaticitynews.com


अमरावती दि. 19 : शनिवारी रात्री विद्यापीठ परिसरातील टेकडीजवळ दोन बिबट आपसात भिडले. या झुंझीत एका नर बिबट्याचा मृत्यू झाला. विद्यापीठ-मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोल पंप समोरील टेकडी परिसरात मृत बिबट्याचा मृतदेह सापडला. घटनेच्या सूचनेवरून वन विभागाच्या पथकाने मृत नर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आले. मृतक बिबट्या हा भानखेडा परिसरातील असून तो विद्यापीठ परिसरात शिरल्याने विद्यापीठ परिसरातील नर बिबट्याने त्याचेवर हल्ला केला. यातच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. असा अहवाल वन विभागाने नोंदवला आहे. गेल्या काही महिन्यातील विविध घटनेत आतापर्यंत ७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्या माहितीनुसार विद्यापीठ परिसरात एक बिबट्याचा मृतदेह दिसून आल्याची माहिती रविवारी सकाळी साडेदहा वाजता वनविभागाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बिट, वनखंड 07 मधील मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोलपंप समोरील टेकडी परिसरात डांबरी रस्ता पासून अंदाजे 100 ते 150 मीटर अंतरावर बिबट (नर) मृत अवस्थेत दिसुन आला. तेथून ५० फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसले. मृत बिबटची प्राथमिक पाहणी केली असता त्याचे डोक्यावर ओरखडे, जिभ दातामध्ये दबलेली तसेच पंज्यावर व चेहऱ्यावर नखाने ओरडलाच्या खुणा दिसून आल्या. पशुचन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी (शल्य चिकत्सालय) डॉ. सागर ठोसर यांनी त्या नरबिबट मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. त्या बिबट्याच्या डोक्याच्या आतील भागात जखम झाल्याने त्याचे मेंदूत अतीरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बांबू गार्डन परिसरात वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आला.
वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्रच सुरु
गेल्या काही महिन्यापासून शहरात वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाले आहे. काही दिवसाआधीच एक बिबट ठार झाला, काल-परवा छत्री तलाव-भानखेडा मार्गावर एक रानमांजर गाडीखाली आल्याने चिरडल्या गेले तोच आता रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याचा मृतदेह सापडला. अमरावती जिल्ह्यातील दुसरा क्रमांकाचे वनक्षेत्र असलेल्या पोहरा-मालखेड जंगलात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांना त्यांचा हक्काचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊन जीव गमवावा लागत आहे. वन्य प्राण्यांच्या या मृत्यू सत्रासाठी येथील निंद्रिस्त्र प्रशाषणच जवाबदार असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी निलेश कांचनपुरे यांनी केला आहे.
आणखी किती वन्यजीवांचे बळी घेणार ?
अमरावती शहरालगत असलेल्या वडाळी, पोहरा, मालखेड या प्रादेशिक वनक्षेत्रामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी आढळून येत असून हे जंगल राखीव वनक्षेत्र म्हणून शासन दरबारी याची नोंद आहे परंतु गेल्या काही दिवसात या ठिकाणी स्थानिक राजकीय लोकांनी उच्छाद मांडल्यामुळे व विकाऊ वन अधिकाऱ्यांमुळे सदर जंगल सद्यस्थितीत स्मशान बनण्याच्या मार्गांवर असल्याचे दिसून येत आहे. जिथे सामान्य नागरिकांना एक झाड तोडल्यास शिक्षा होते त्याठिकाणी वन अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हजारो हेक्टर जंगल विनापरवानगी नष्ट करण्यात येत आहे. यामुळे येथील वन्यप्राणी विस्थापित होत असून गेल्या वर्षभरात 7 बिबट्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे व अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. एकीकडे शासन हेच प्राणी वाचविण्याकरिता करोडो रुपये खर्च करीत असल्याचे भासवीत असतांना केवळ पक्षाचे आमदार, खासदार व ताटाखालचे मांजर असलेले अधिकारी आहेत म्हणून कार्यवाही करणार नाही ही भूमिका जर शासनाची असेल तर सामान्य जनतेला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल व यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागेल अशी भूमिका वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी विषद केली


One died in a fight between two leopards! The body was found in the university premises
All

Labels: , , ,

अयोध्येचे स्वामी सत्येंद्र व हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज मंगळवारी अमरावतीत !



अमरावती दि. 19 : श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील बाबरी पतन ते भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर निर्माण या सर्व घडामोडींचे गेल्या 35 वर्षापासून अग्रणी शिलेदार असलेले स्वामी सत्येंद्रजी तसेच हनुमान गढी अयोध्याचे मुख्य महंत राजू दास महाराज हे मंगळवारी (ता.१९) अमरावतीत येत असून ते श्री हनुमान गढी अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजक आ.रवी राणा, खा. नवनीत राणा यांनी सांगितले.


श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्ला चे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी सदा अग्रसर असणारे स्वामी सत्येंद्रजी हे कट्टर हिंदुत्ववादी असून गेल्या 35 वर्षा पासून यासाठी कठीण संघर्ष त्यांनी केला आहे. बाबरी पतन,एका छोट्या तबुंत असलेली प्रभू श्री रामाची मूर्ती ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन यासाठी जे मोजके शिलेदार आहेत त्यापैकी एक स्वामी सत्येंद्रजी आहेत. तसेच महंत राजुदास महाराज हे हनुमान गढी अयोध्या चे मुख्य महंत असून त्यांनीच हनुमान गढी अमरावती येथे स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेसाठी श्री राम जन्मभूमी तसेच हनुमान गढी अयोध्या येथील पवित्र मातीचे कलश आमदार रवी राणा यांना सुपूर्द केले होते. मंगळवारी अमरावतीच्या हनुमान गढी येथे सुरु पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुरान कथेदरम्यान स्वामी सत्येंद्र व महंत राजूदास महाराज यांच्या दर्शनाचा लाभ लाखो भक्तांना घेता येईल असे आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा यांनी कळविले आहे.

 

Labels: , , , ,

फोनपे'त पैसे नव्हते म्हणून १५ ग्रॅमची चेन हिसकावली





अमरावती : एका तरुणाला धाक दाखवून त्याच्या फोन पे अकाउंटमध्ये पैसे नसल्याने त्याच्याकडील १५ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली. १६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास संविधान चौकात ही घटना घडली, निखिल खडसे (३०, रा. विलासनगर) याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सागर काकणे (रा. रमाबाई आंबेडकर नगर) व अनिकेत नामक तरुणाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला.
निखिल खडसे हा मित्राशी बोलत असताना तेथे आरोपी आले. त्यांनी निखिलला कॉल करण्यासाठी मोबाइल मागितला. ते मोबाइल घेऊन जाऊ लागल्याने निखिल व त्याचा मित्र सुद्धा सागरच्या मागे गेले. सागर काकणे व अनिकेत हे दोघे निखिल व त्याच्या मित्राला अंधारात घेऊन गेले. तेथे निखिलला पैशाची मागणी केली. त्याच्याकडे पैसे नसल्याने आरोपीने फोन पे जबरदस्तीने उघडायला लावले. परंतु अकाउंटला पैसे नसल्याने आरोपीने निखिलला मारहाण केली. तथा त्याच्या गळ्यातील चेन हिसकून नेली. निखिलच्या मित्राने पोलिसांच्या डायल११२ वर कॉल केला.


 

Labels: , , ,

ऑनलाइन फसवणुकीतील पैसे मिळणार तरी कसे? 'सायबर'चे मनुष्यबळ अपुरे : गुन्हेगार परराज्यांत; तक्रारींचा ओघ

अमरावती : कोरोना काळानंतर देशभरात लोकांकडून ऑनलाइन डिजिटल बँकिंगचा वापर अधिकाधिक केला जात आहे. ऑनलाइन खरेदीवरही नागरिक भर देऊ लागले आहे. यामुळे सायबर क्राइममध्येही वाढ होऊ लागली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष, भूलथापा देत, तर कधी भीती दाखवून परस्पर बैंक खात्यात लाखो ते कोट्यवधी रुपये वळवून फसवणूक केली जात आहे. गुन्हेगार परराज्यांतील असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सायबर पोलिसांना विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

रोज किती तक्रारी येतात?

शहर आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात दररोज विविध प्रकारच्या सरासरी दोन ते तीन तक्रारी येतात. तक्रारीचे स्वरूप बघून गुन्हे दाखल करून घेतले जातात. फसवणुकीसह सोशल मीडियाचे अकाउंट हॅकिंगच्या तक्रारी येतात.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

१६ कर्मचारी

पोलिस आयुक्तालयातील सायबर ठाण्यात १६ अंमलदार आहेत. मात्र, त्यांनादेखील मर्यादा आहेत.सायबर पोलिस ठाण्यात मनुष्यबळ किती? एक पोलिस निरीक्षक १ एपीआय, एक पीएसआयसायबर ठाण्याकरिता एक पोलिस निरीक्षक आहे. ती ठाणेदारी गजानन तामटे यांच्याकडे आहे.सायबर ठाण्यात एक सहायक पोलिस निरिक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक आहे.

अडचणी काय?

आरोपी एकच, गुन्हे अधिक: कधी-कधी सायबर गुन्हेगार एकच असतो; मात्र त्याच्यावरगुन्हे वेगवेगळे असतात. सायबर गुन्हेगाराचा माग काढताना त्यामुळे अडचणी उद्‌भवतात.तपासाचे धागेदोरे परराज्यांत: सायबर गुन्ह्यांच्या सर्वच तपासाचे धागेदोरे हे महाराष्ट्राच्या  बाहेर असल्याचे समोर येते. यामुळे या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रदेशांत दौरे करावे लागतात.

बंदोबस्ताची जबाबदारी अधिवेशनासारखे मोठे कार्यक्रम असो किंवा मोठ्या राजकीय व्यक्तीचे दौरे असल्यास किंवा त्यांचे कार्यक्रम असल्यास शहराबाहेरच्या वाढीव बंदोबस्ताचाही ताण सायबर पोलिसांना झेलावा लागतो.

 कोर्टाच्या वाऱ्या : अनेकदा ठाणेदार व सहायक पोलिस निरीक्षकाला आरोपपत्र व अनुषंगिक कामासाठी न्यायालयात जावे लागते. कधीकाळी नागपूर उच्च न्यायालयाच्या वाऱ्यादेखील कराव्या लागतात. त्यामुळे तपासाला मर्यादा येतात.

गरज किती कर्मचाऱ्यांची?

दोन लाखांवरील फसवणुकीबाबतच्या तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र, अन्य सर्व तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. परिणामी, अधिक मनुष्यबळाची गरज आहे.सायबर ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी बहुतांश तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यात नोंदविल्या जातात. अलीकडे सायबर फसवणुकीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. गुन्हे निखंदूत काढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

Labels: , , ,

लोकसभेपूर्वी होणार महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने मागविली पात्र अधिकाऱ्यांची माहिती


अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उपजिल्हाधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात येणार आहेत. हे अधिकारी सध्या कोणत्या पदावर कार्यालयात आणि गट पाच वर्षांत कोठे कोठे काम केले आहे. अधिक माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात बदल्या होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. त्यानंतर

सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणाऱ्या या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि नाहीत तहसीलदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. लोकसभेसाठी उपजिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर तालुका तहसीलदार यांना त्यांचे सहायक म्हणून काम करावे लागते अधिकारी जिल्ह्याचा रहिवासी असल्यास स्थानिक राजकीय नेते मंडळींची त्यांची जवळीक असते त्यामुळे निवडणूक कामात पारदर्शकपणा येणार नाही अशी निवडणूक आयोगाला वाटते. त्यामुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.


Labels: , , ,

नाकाबंदीत धारणी पोलिसांनी रोखली ५८ गोवंशाची कत्तल


धारणी/अमरावती : मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात होणारी ५८ गोवंशाची वाहतूक, कत्तल धारणी पोलिसांनी रोखली. मध्य प्रदेश ते अकोट मार्गावर १७ डिसेंबरला झांझरी ठाणाजवळ नाकाबंदी करून ती कारवाई केली.

घटनास्थळाहून शेख असलम शेख हासम (३५), अन्सार खान समशेर खान (२२), कादिमोददीन इक्रामोददीन (३५), मो. सोहेल मो. सुलतान (३५), अरबाज खान अयुब खान (२५) व अ. शरीफ अ. लतिफ (३६,

रा. हिवरखेड, ता. आकोट, जि. अकोला) यांना ताब्यात घेतले. ते ५८ गोवंशांना अमानुषरीत्या एकमेकांना बांधून कत्तलीकरिता घेऊन जातांना मिळून आले. आरोपींकडून ७ लाख किमतीचे ५८ गोवंश व २.५० लाखांच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या, एसडीपीओ अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणीचे ठाणेदार अशोक जाधव, उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, रिना सदार, अंमलदार विनोद धर्माळे, साबुलाल दहीकर, संजय मिश्रा, प्रेमानंद गुडधे, जगत तेलगोटे, मोहित आकाशे, राम सोळंके आदीनी केली.

Labels: , , ,

संत्रा उत्पादकांसाठी ठोस धोरण राबवावे अॅड. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी, सरकारवर ताशेरे



अमरावती : विदर्भातील शेतकरी दरवर्षी सुमारे १२ ते १५ लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पन्न घेत असतात. मात्र, या संत्र्याला निर्यात धोरण राबविण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. निर्यातीसाठी असलेल्या विशिष्ट प्रोटोकॉलमध्ये केंद्र सरकारने संत्र्याची नोंद केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या देशात संत्रा पाठवायचा, याची माहिती मिळाली नाही. परिणामी राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन परदेशात पाठवता येत नाही. राज्यात पाच खासगी संत्रा निर्यात केंद्र आहेत, मात्र एकही सरकारी निर्यात केंद्र नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेत केला.

संत्रा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात विदर्भातील असून, लाखो मे. टन संत्रा उत्पादन होते. मात्र, यापैकी अत्यंत कमी प्रमाणात संत्र्याची निर्यात परदेशात केली जाते. केवळ बांगलादेशातच संत्र्याची निर्यात केली जात असून, अन्य देशांमध्ये संत्र्याची मागणी आहे का? किंवा कोणत्या पद्धतीचा संत्रा अन्य देशांमध्ये खाल्ला जातो, याबाबतची कोणतीही माहिती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नाही. ही माहिती प्राप्त होण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अपेडा किंवा केंद्र सरकारच्या आयसीसीआर यांच्या माध्यमातून माहिती दिली जाते. विशिष्ट प्रोटोकॉल नोंद करताना संत्रा या पिकाची नोंद केली गेली नसल्याने ही माहिती या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे ठाकूर म्हणाल्या. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी अपेडा आणि आयसीसीआर या संस्थांमध्ये संत्रा निर्यातीबाबत सामंजस्य करार झाला. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही. शेतकऱ्यांना निर्यातक्षम संत्रा उत्पादन करण्यासाठी सरकारने निर्यात केंद्र उभारावे, अशी मागणी अॅड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली.


Labels: , , ,

Saturday, December 9, 2023

Road Accident | बेटी को स्कूल छोड़कर वापस जा रहे पिता की दुर्घटना में मौत

अमरावती. अपनी बेटी को स्कूल में छोड़कर घर वापस जा रहे पिता की मोटरसाइकिल को ट्रक ने टक्कर मार दी. ट्रक के पहिए के नीचे आने से उसकी जगह पर ही मौत हो गई. घटना अंजनगांव अकोट मार्ग के रत्नाबाई राठी हाईस्कूल के सामने शुक्रवार की सुबह हुई.

पुलिस सूत्रों के मुताबिक पिपलखुटा में रहने वाले शरद धांडे (45) अपनी बेटी को आदर्श प्राथमिक शाला में छोड़कर दुपहिया से वापिस लौट रहे थे. तभी रत्नाबाई राठी हाईस्कूल के सामने वाली सड़क पर ट्रक ने शरद की दुपहिया टक्कर मार दी. ट्रक के पहिए की चपेट में आने उसकी घटनास्थल पर मौत हो गई. दर्यापुर पुलिस ने पंचनामा कर शव को पोस्टमार्टम हेतु भिजवाया गया.

साथ ही ट्रक को भी जब्त किया गया. उल्लेखनीय है कि अकोट रोड पर शिवाजी शिक्षा संस्था द्वारा संचालित आदर्श हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रत्नाबाई राठी हाईस्कूल व आदर्श प्राथमिक शाला नामक तीन शैक्षणिक संस्थान है. रोजाना सुबह 11 बजे सत्र के छूटने और दोपहर के सत्र के शुरू होने के समय यहां पर विद्यार्थियों व उनके अभिभावकों की भीड़ रहती है.

Labels: