Tuesday, November 14, 2023

BHATKULI | भातकूली नगर पंचायतची अग्निशामक दलाची गाडी बनली शोभेची वस्तू....


भातकुलीअमरावती जिल्ह्यातील भातकुली शहरातील नगर पंचायत ची अग्निशामक दलाची गाडी धुळखात ग्रामीण रुग्णालय मधे भरती आहे.4/5 वर्षापूर्वी नगर पंचायत भातकुली ला अग्निशामक दलाची गाडी मिळाली.त्यामुळे शहरात लागणाऱ्या आगीवर नियत्रंन राहणार अशी चर्चा शहरातील लोकांमधे होती.त्यामुळे सर्वाँना आनंदच झाला होता शहर आणि आजू बाजूच्या खेड्याच्या परिसरात आग लागल्यास तातडीने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहचेल अशी आशा होती.परतू ती आशा मात्र धुळीस मिळाली आहे. लाखो रुपयांची अग्निशामक दलाची गाडी ग्रामीण रुग्णालय मधे भरती केलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.कारण अग्निशामक दलाची गाडी चालवण्यासाठी ना चालक नाही ना कर्मचारी नाही आणि विशेष म्हणजे आग विझवण्यासाठी पाणीच नाही.अशी लाखो रुपयांची अग्निशामक दलाची नगर पंचायत ची गाडी धुळखात ग्रामीण रुग्णालय परिसरात पडलेली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी शहरात श्री राम मंदिरात पहाटे ३.३० च्या सुमारास भीषण आग लागली हि आग फटाक्यामुळे लागल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.रात्री गस्तीवर असणारे पोलिस कर्मचारी हवालदार रहीम शेख यांना ही आग दिसली त्यांनी क्षनाचाही विलंब न लावता अग्निशामक दलाची गाडी अमरावती वरून अवघ्या 20 मिनिटात बोलावली.तसेच लोकांना जागे करून सर्तक केले आग विझवण्यात अमरावती अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करीत आहे आग विझवण्यासाठी तब्बल तीन तासाची कसरत अग्निशमन दलाच्या पथकाला करावे लागलेत या आगीमुळे मंदिराचे ७ ते ८ लाखाचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दल व रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिस कर्मचारी पोलीस हवालदार रहीम शेख, सज्जाद खान, गौतम ढोणे, चालक सन्नी ,जगदीश शीरपुरे यांच्या सर्तक मुळे जीवीत हानी टळली.अन्यथा भातकुली शहरामध्ये गंभीर परिस्थिती उद्भवली असती. नप भातकुली ची अग्निशामक दलाच्या गाडी ची वाट पाहत बसलो असतो तर कदाचित आर्थिक हानी आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असती.शहरामध्ये जनतेकडून टॅक्स वसूल केल्या जाते आणि त्या टॅक्स वसूल मधे सर्वात जास्त आकारमान हा अग्निशामक वर लावण्यात येत असते.जर नप कार्यालय भातकुली अग्निशामक सुविधा पुरवू शकत नाही तर हे टॅक्स कश्यासाठी वसूल करतात. जर अग्निशामक सेवा पुरविण्यात अपयशी ठरत असेल तर अग्निशामक कर जनतेकडून वसूल करू नये असा सवाल नगरसेवक सतीश आठवले यांनी केला आहे.

नगरपंचायत भातकुली अग्निशामक दलाची गाडी केवळ त्या गाडीवर चालक,पाणी,कर्मचारी नसल्याने शोभेची वस्तू बनली आहे ती गाडी ग्रामीण रुग्णालय मधे भरती केलेली आहे.जनतेकडून जो जबरदस्तीने अग्निशामक कर वसूल केल्या जातो तो ताबडतोब बंद करावा आणि पोलीस हवालदार रहीम शेख व ईतर कर्मचारी तसेच अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांचे मी आभार मानतो.त्यांच्या सर्तकतेमुळे आग आटोक्यात आली अन्यथा जीवितहनी झाली असती.

सतिश शंकरराव आठवले
नगरसेवक भातकुली

Labels: , ,